RSS ने ५२ वर्ष तिरंगा का फडकावला नाही? २००२ पूर्वीच्या फ्लॅग कोडमध्ये काय म्हटलंय?

भाग्यश्री राऊत

मुंबई: पंतप्रधान मोदींनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली. आपल्या सोशल मीडियावर प्रोफाईल म्हणून तिरंगा ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर सर्वांनी प्रोफाईल बदलायला सुरुवात केली. काँग्रेसनेही यात उडी घेत पंडीत जवाहरलाल नेहरूंचा हातात तिरंगा असलेला फोटो सगळीकडे लावला आणि भाजपवर टीका करायला सुरुवात केली. आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपसह आरएसएवर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: पंतप्रधान मोदींनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली. आपल्या सोशल मीडियावर प्रोफाईल म्हणून तिरंगा ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर सर्वांनी प्रोफाईल बदलायला सुरुवात केली. काँग्रेसनेही यात उडी घेत पंडीत जवाहरलाल नेहरूंचा हातात तिरंगा असलेला फोटो सगळीकडे लावला आणि भाजपवर टीका करायला सुरुवात केली. आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपसह आरएसएवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींचा संदेश त्यांच्याच परिवारापर्यंत पोहोचला नसावा, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं. त्यानंतर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मोहन भागवत आणि आरएसएसच्या ट्विटर हँडलचे फोटो शेअर केले ज्यामध्ये त्यांनी प्रोफाईलवर तिरंगा लावलेला नाही. तिकडे राहुल गांधींनीही ट्विट करत म्हटलं, ज्यांनी ५२ वर्ष तिरंगा फडकवला नाही, अशा संघटनेतून हर घर तिरंगा अभियान चालवणारी ही लोक आली आहेत. यानंतर सोशल मीडियावरही आरएसएसच्या प्रोफाईलवरून वाद सुरू झाला. आरएसएसनं ५२ वर्ष तिरंगा का फडकवला नाही? असा प्रश्न विचारला जातोय. पण, आरएसएसनं ५२ वर्ष तिरंगा का फडकवला नाही? याचं मागचं कारण तुम्हाला माहितीये का?.

राष्ट्रध्वज फडकवण्याविषयी नवीन जिंदाल केस काय होती?

राष्ट्रध्वज कोण आणि कधी फडकवू शकतो हा मुद्दा तेव्हा चर्चेत आला जेव्हा उद्योगपती नवीन जिंदाल यांनी फेब्रुवारी 1995 मध्ये आपल्या कारखान्यावर प्रत्येक दिवशी तिरंगा फडकवायला सुरुवात केली. पण, जिल्हा प्रशासनानं त्यांना बंदी घातली. त्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेत देशातील प्रत्येक नागरिकाला तिरंगा फडकवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. इतक्यात सरकारनं २००२ मध्ये फ्लॅग कोड म्हणजेच ध्वजसंहितेत सुधारणा केली. त्यावेळी आरएसएसचे नेते के. सूर्यनारायण राव यांनी बँगलोरमध्ये माध्यमांशी बोलताना आरएसएसनं ५२ वर्ष आपल्या संघ मुख्यालयावर झेंडा का फडकवला नव्हता? यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, ”२००२ पूर्वीच्या फ्लॅग कोडमध्ये तिरंगा फडकवण्याबाबत नियम अधिक कडक होते. पण, २००२ मध्ये फ्लॅग कोडमध्ये दुरुस्ती करण्यात आली.”

RSS चं म्हणणं काय? –

फ्लॅग कोडमधील नियमांमुळे आम्ही इतके दिवस तिरंगा फडकवला नाही. पण, आता नियम शिथिल झाल्यामुळे आम्हाला आता तिरंगा फडकवायला हरकत नाही. सध्या जो वाद सुरूये त्याबाबत मुंबई तकनं संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्यासोबत संपर्क साधला. त्यांनीही आम्हाला नवीन जिंदाल केसचा दाखला दिला. ते म्हणतात, ”नागरिकांना २००२ पूर्वी तिरंगा फडकवण्याची परवानगी नव्हती. पण, आता आमचा हरघर तिरंगा अभियानाला पाठिंबा आहे. त्याचं कोणीही राजकारण करू नये.”

हे वाचलं का?

    follow whatsapp