महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन वाढणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे

मुंबई तक

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) राज्य सरकारकडून 15 मेपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकार पुढील तीन दिवसानंतर आणखी लॉकडाऊन वाढवणार का? असा सवाल राज्यातील प्रत्येक नागरिक विचारत आहे. खरं तर या प्रश्नाचं आजच उत्तर मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण की, आज (12 मे) राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडणार आहे. याच बैठकीत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) राज्य सरकारकडून 15 मेपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकार पुढील तीन दिवसानंतर आणखी लॉकडाऊन वाढवणार का? असा सवाल राज्यातील प्रत्येक नागरिक विचारत आहे. खरं तर या प्रश्नाचं आजच उत्तर मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण की, आज (12 मे) राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडणार आहे. याच बैठकीत लॉकडाऊन वाढवायचा की नाही? (Will lockdown increase) यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. मागील लाटेच्या तुलनेत यंदा अत्यंत वेगाने रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन केला आहे. आता लॉकडाऊन परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मागील आठवड्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत बऱ्यापैकी घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मात्र, असं असलं तरीही राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं मत प्रशासनाचं आहे. कारण अद्याप रुग्णांची संख्या म्हणावी तेवढी कमी झालेली नाही.

पुढच्या दोन दिवसात कोल्हापुरात लागणार कठोर लॉकडाऊन-हसन मुश्रीफ

हे वाचलं का?

    follow whatsapp