सुप्रिया सुळे, आव्हाड म्हणतात; 25 वर्ष ठाकरे सरकार चालेल.. पण याच प्रश्नावर अजित पवार का संतापले?

मुंबई तक

पुणे: ‘राज्यातील ठाकरे सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात 5 वर्षच नव्हे तर तब्बल 25 वर्ष चालेल.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेत बोलताना केलं होतं. तर ‘2024 ला देखील हेच सरकार येईल आणि मी उद्धवलाच पुन्हा मुख्यमंत्री करेन. असं पवार साहेबांनी खासगीत सांगितलं होतं.’ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुणे: ‘राज्यातील ठाकरे सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात 5 वर्षच नव्हे तर तब्बल 25 वर्ष चालेल.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेत बोलताना केलं होतं. तर ‘2024 ला देखील हेच सरकार येईल आणि मी उद्धवलाच पुन्हा मुख्यमंत्री करेन. असं पवार साहेबांनी खासगीत सांगितलं होतं.’ असं वक्तव्य NCP चे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कालच (9 डिसेंबर) एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. पण जेव्हा या दोन्ही वक्तव्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारण्यात आलं तेव्हा मात्र ते चांगलेच भडकल्याचं दिसून आले.

पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर ‘मुंबई Tak’च्या प्रतिनिधीने जेव्हा सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या 25 वर्ष ठाकरे सरकारबाबत केलेल्या वक्तव्याविषयी अजित पवार यांना सवाल केला तेव्हा ते संतापल्याचे दिसून आले.

मुंबई Tak प्रतिनिधी: सुप्रिया सुळे आणि आव्हाड यांनी असं म्हटलं आहे की, 25 वर्ष ठाकरे सरकारच राहील.. तुमचं काय म्हणणं आहे?

अजित पवार: ‘ते त्यांनीच सांगितलंय ना.. मग त्यांनाच विचारा ना.. बाकीचे कोण-कोण काही बोलणार.. ते असे बोलले म्हणून तुमचं काय मत… यावर माझं काही उत्तर नाही. मला माझ्यापुरते प्रश्न विचारत जा. मी त्याची उत्तरं देत जाईन.’ असं अजित पवार यांनी कॅमेऱ्यासमोर सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp