देवेंद्र फडणवीस सावरकरांबद्दल नेमकं काय म्हणाले, की वाद झाला?

मुंबई तक

विनायक दामोदर सावरकर आणि बोस बंधू यांच्यात सख्य होतं, असा दावा करणारं देवेंद्र फडणवीस यांचं भाषण वादात सापडलंय. सुभाषचंद्र बोसांनी सावरकरांची पुस्तकं रिप्रिंट करून आझाद हिंद सेनेतील सैनिकांना वाचायला दिल्याचा दावा फडणवीसांनी केला. फडणवीसांचा हा दावाच खोटा असल्याचे आरोपही होत आहेत. मुंबई महापालिका शिवसेनेकडून खेचून घेण्यासाठी भाजपनं कंबर कसलीय. मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं मराठी […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

विनायक दामोदर सावरकर आणि बोस बंधू यांच्यात सख्य होतं, असा दावा करणारं देवेंद्र फडणवीस यांचं भाषण वादात सापडलंय. सुभाषचंद्र बोसांनी सावरकरांची पुस्तकं रिप्रिंट करून आझाद हिंद सेनेतील सैनिकांना वाचायला दिल्याचा दावा फडणवीसांनी केला. फडणवीसांचा हा दावाच खोटा असल्याचे आरोपही होत आहेत. मुंबई महापालिका शिवसेनेकडून खेचून घेण्यासाठी भाजपनं कंबर कसलीय. मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं मराठी कट्टा नावानं एक उपक्रम हाती घेतलाय. ११ ऑक्टोबरला गिरगावातून याची सुरवात झाली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर भाषण दिलं. फडणवीसांनी वेगवेगळे दाखले गेले. त्यामुळेच आपण हा वाद काय, फडणवीस बोलले काय आणि नेमका आक्षेप कशावर आहे, तेच या व्हिडिओमध्ये बघूया.

    follow whatsapp