शिवसेनेच्या पराभवानंतर संजय राऊत म्हणतात, भाजपचा विजय झाला असं मी मानत नाही!

मुंबई तक

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला आणि विशेषत: शिवसेनेला अत्यंत अनपेक्षितपणे पराभवाचा धक्का दिला. या निवडणुकीत भाजपने आपला तिसरा उमेदवार जिंकून आणण्यात यश मिळवलं आहे. मात्र, असं असलं तरीही शिवसेना खासदार संजय राऊत हे मात्र हा भाजपचा विजय नसल्याचं म्हणत आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत यांनी मीडियासमोर येऊन हा भाजपचा विजय नसल्याचं म्हटलं आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला आणि विशेषत: शिवसेनेला अत्यंत अनपेक्षितपणे पराभवाचा धक्का दिला. या निवडणुकीत भाजपने आपला तिसरा उमेदवार जिंकून आणण्यात यश मिळवलं आहे. मात्र, असं असलं तरीही शिवसेना खासदार संजय राऊत हे मात्र हा भाजपचा विजय नसल्याचं म्हणत आहेत.

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत यांनी मीडियासमोर येऊन हा भाजपचा विजय नसल्याचं म्हटलं आहे. भाजपने निवडणूक आयोगावर दबाव टाकून हा विजय मॅनेज केला असल्याची टीका यावेळी संजय राऊतांनी केली आहे.

पाहा संजय राऊत काय म्हणाले:

‘भाजपने नक्कीच जागा जिंकली पण त्यांचा विजय झाला असं मी मानत नाही. पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं ही संजय पवारांना होती. किती होती तर 33 पहिल्या पसंतीची… 26 किंवा 27 मतं महाडिकांना पडली. दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर त्यांचा विजय झाला. हे मान्य आहे. पण मोठा विजय झाला वैगरे हे जे काही चित्र निर्माण केलं तसं नाहीए. काही अपेक्षित मतं. बाहेरची आम्हाला पडू शकले नाहीत हे खरं आहे.’ असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp