Eknath Shinde ” ….तेव्हा बाळसाहेब ठाकरेंना खऱ्या अर्थाने दुःख झालं असेल”
२०१९ ची निवडणूक आम्ही सगळ्यांनी महायुती म्हणून लढवली होती. बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो प्रचाराच्या बॅनरवर होते. जनतेने महायुतील कौलही दिला. मात्र दुर्दैवाने भाजपला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्यात आली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंना खऱ्या अर्थाने दुःख झालं असेल. ज्यांना बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर जवळ केलं नाही त्यांच्यासोबत शिवसेना गेली असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
ADVERTISEMENT

२०१९ ची निवडणूक आम्ही सगळ्यांनी महायुती म्हणून लढवली होती. बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो प्रचाराच्या बॅनरवर होते. जनतेने महायुतील कौलही दिला. मात्र दुर्दैवाने भाजपला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्यात आली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंना खऱ्या अर्थाने दुःख झालं असेल. ज्यांना बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर जवळ केलं नाही त्यांच्यासोबत शिवसेना गेली असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे तसंच आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
Eknath Shinde : “अन्यायाविरोधात पेटून उठा या बाळासाहेबांच्या विचारांवर आमची वाटचाल”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले आहेत बाळासाहेब ठाकरेंबाबत?
आम्ही जी भूमिका घेतली ती बाळासाहेब ठाकरे यांना आवडणारी भूमिका आहे कारण ही त्यांच्या विचारांची भूमिका आहे. युतीचं सरकार यापूर्वीही राज्यावर आलं होतं. त्याचे शिल्पकार बाळासाहेब ठाकरे होते. महायुती म्हणून निवडणूक लढवण्यात आली. २०१९ ला जनतेने आम्हाला कौलही दिला. मात्र दुर्दैवाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यात आली.
महाविकास आघाडी तयार करण्यात आली तेव्हाच बाळासाहेब ठाकरेंना दुःख झालं असेल
महाविकास आघाडी तयार करण्यात आली तेव्हाच बाळासाहेब ठाकरेंना दुःख झालं असेल. कारण महाविकास आघाडीत आमच्या आमदारांचं खच्चीकरण होत होतं, शिवसैनिकांवर अन्याय होत होता. शिवसैनिकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही हा लढा उभा केला. बाळासाहेब ठाकरेंना आता खरा आनंद वाटत असेल. शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेतला याचं त्यांना समाधान असेल असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.