Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी संजय शिरसाटांना फोन गेला होता, पण…
औरंगाबाद: संजय शिरसाट, हे साधं नाव नाही, शिवसेनेतलं मोठं नाव, त्यातल्या त्यात औरंगाबादमध्ये शिरसाटांच्या कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे. ते ठाकरे गटात असोत की शिंदे गटात चर्चेत राहणार म्हणजे राहणारच. एकनाथ शिंदेंनी बंड केलं, त्यात सगळ्यात आधी नाव होतं ते म्हणजे संजय शिरसाटांचं. शिंदे गटातून उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज देणारा नेता म्हणून पहिल्यांदा संजय शिरसाट समोर […]
ADVERTISEMENT

औरंगाबाद: संजय शिरसाट, हे साधं नाव नाही, शिवसेनेतलं मोठं नाव, त्यातल्या त्यात औरंगाबादमध्ये शिरसाटांच्या कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे. ते ठाकरे गटात असोत की शिंदे गटात चर्चेत राहणार म्हणजे राहणारच. एकनाथ शिंदेंनी बंड केलं, त्यात सगळ्यात आधी नाव होतं ते म्हणजे संजय शिरसाटांचं. शिंदे गटातून उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज देणारा नेता म्हणून पहिल्यांदा संजय शिरसाट समोर आले. नंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली. पण सुरुवात केली ती शिरसाटांनीच.
मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी संजय शिरसाटांनाही फोन गेला होता, पण…
आता याच शिरसाटांचं नाव मंत्रिमंडळाच्या यादीवरुनही चर्चेत होतं. शिंदे सरकारचा छोटासा मंत्रिंमडळ विस्तार झाला. या विस्ताराच्यावेळी संजय शिरसाटांनाही फोन गेला होता, तो फोन मंत्रीमंडळात वर्णी लागल्याचा होता की समजूतीचा होता, हे सांगणं कठिण आहे, मात्र त्या फोननंतर जो काही गदारोळ झाला, त्यामुळे संजय शिरसाटांना नाहक त्रास सहन करावा लागला.
Nitin Gadkari: ”चंद्रशेखर बावनकुळेंनी बायकोसुद्धा पळवून आणली होती”
मी कॅबिनेटमंत्री आणि पालकमंत्र्यांची मागणी केली आहे- संजय शिरसाट
औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाटांनीच हा खुलासा केला आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागता लागता राहिली, मात्र मी कॅबिनेटमंत्री आणि पालकमंत्र्यांची मागणी केलेये, असं रोखठोक संजय शिरसाट हे पत्रकारांना सांगतांना दिसत आहेत. आता त्यांची दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात तरी वर्णी लागणार का आणि शिरसाटांनी मागितलेल्या गोष्टी त्यांना मिळणार का, हे पाहणं गरजेचं आहे.