म्यांव, म्यांव प्रकरण काढून नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पुन्हा डिवचलं
भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा आदित्य ठाकरे यांना डिवचलं आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त राणे वरळी येथे आले होते. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात येऊन थेट त्यांच्यावर नितेश राणेंनी निशाणा साधला आहे. सध्या दहीहंडी उत्सवात राजकीय नेते एकमेकांवर टोलेबाजी करायची संधी सोडत नाहीयेत. पेंग्विन पार्कमध्ये कसं पाठवायचं हे आम्हाला माहिती, असं नितेश राणे म्हणाले. काय म्हणाले […]
ADVERTISEMENT

भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा आदित्य ठाकरे यांना डिवचलं आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त राणे वरळी येथे आले होते. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात येऊन थेट त्यांच्यावर नितेश राणेंनी निशाणा साधला आहे. सध्या दहीहंडी उत्सवात राजकीय नेते एकमेकांवर टोलेबाजी करायची संधी सोडत नाहीयेत. पेंग्विन पार्कमध्ये कसं पाठवायचं हे आम्हाला माहिती, असं नितेश राणे म्हणाले.
काय म्हणाले नितेश राणे?
“वरळीत कोणीही भाजपला आव्हान देण्याची हिमंत करु नये. पेंग्विन पार्कमध्ये कसं पाठवायचं हे आम्हाला माहिती. विधानसभेच्या पायऱ्यांवर साधा मी म्यांव म्यांव आवाज काढल्यावर काय अवस्था झाली, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहीली आहे. त्यामुळे उगाच डरकाळी मारण्याचा प्रयत्न कोणी करु नये. मुंबई काही कोणत्या साहेबांची नाही मुंबई असंख्य मुंबईकरांची आहे, हे लक्षात ठेवा,” असे नितेश राणे म्हणाले.
काय आहे म्यांव, म्यांव प्रकरण?