मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार,राजीनाम्याचा प्रश्नच नाही; संजय राऊत यांचा दावा

मुंबई तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार इतर कुणालाही मुख्यमंत्री होऊ देणार नाही. इतर कुणालाही मुख्यमंत्री करण्याचा प्रश्नच येणार नाही. वर्षा बंगल्यावर शरद पवार आले होते. त्यांच्याशी आमची सविस्तर चर्चा झाली त्यानंतर आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढणार. फ्लोअर टेस्ट झाली तर आम्ही बहुमत सिद्ध करू तशीही आमची तयारी आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेसाठी २१ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार इतर कुणालाही मुख्यमंत्री होऊ देणार नाही. इतर कुणालाही मुख्यमंत्री करण्याचा प्रश्नच येणार नाही. वर्षा बंगल्यावर शरद पवार आले होते. त्यांच्याशी आमची सविस्तर चर्चा झाली त्यानंतर आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढणार. फ्लोअर टेस्ट झाली तर आम्ही बहुमत सिद्ध करू तशीही आमची तयारी आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेसाठी २१ जून हा दिवस अत्यंत भीषण असा ठरला आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून शिवसेनेला खिंडार पाडलं आहे. शिवसेनेच्या निम्म्यापेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. काही वेळापूर्वीच गुलाबराव पाटील हेदेखील एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. गुवाहाटीला ते पोहचले आहेत

Exclusive : एकनाथ शिंदे यांच्याकडे ४६ आमदारांचं बळ, लवकरच पुढचा निर्णय

एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं ते शिवसेनेतलं आत्तापर्यंत सर्वात मोठं बंड ठरलं आहे. शिवसेना सत्तेत असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी थेट बंडाचा झेंडा उद्धव ठाकरेंच्याविरोधातच उगारला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp