विधान परिषदेचा निकाल लटकला, राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच हाय व्होल्टेज ड्रामा

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान काही वेळापूर्वीच पार पडलं आहे. मात्र, राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीचा निकाल देखील लांबणीवर पडणार आहे. कारण काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीचा निकाल हा दुसऱ्या दिवशी पहाटे 3 जाहीर करण्यात आला होता. कारण यावेळी मतदान प्रक्रियेत दोन्ही बाजूकडून आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण थेट केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत गेलं होतं. आज (20 जून) पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल देखील अशाच पद्धतीने लांबण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

भाजपच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. सुरुवातीला हे याबाबतचं पत्र राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आलं होतं. मात्र, आता हे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलं आहे. काँग्रेसने या आक्षेप पत्रात असं नमूद करण्यात आलं आहे की, जगताप आणि टिळक या दोन्ही आमदारांच्या वतीने त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदान केलं आणि मतपत्रिका बॅलेट पेपरमध्ये टाकली. त्यामुळे त्यांचं मत बाद ठरविण्यात यावं.

मत प्रक्रियेचं उल्लंघन झाल्याने ही मतं रद्द करावी असा आक्षेप घेणारं पत्र काँग्रेसने रिटर्निंग ऑफिसरला दिलं होतं. त्यानंतर आता हे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलं आहे. त्यामुळे याबाबत नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या सगळ्या प्रक्रियेमुळे या निवडणुकीचा निकाल लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नवाब मलिक, अनिल देशमुख यांना परवानगी नाहीच; सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?

जगताप आणि टिळक यांची मतं बाद ठरविण्यासाठी काँग्रेसचा नेमका आक्षेप काय?

ADVERTISEMENT

भाजपचे दोन मतदार म्हणजे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे मतदान कक्षापर्यंत आले. पण त्यांनी मताचा अधिकार त्यांच्या सहकार्यांना दिला. त्यामुळे त्यांच्या वतीने इतर कुणीतरी मतदान केलं. यावर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे.

ADVERTISEMENT

नियमानुसार, जर तुम्हाला दुसऱ्याला मताचा अधिकार द्यायचा असेल तर त्यासाठी काही नियम आहे. एखादा मतदार अशिक्षित, अंध किंवा त्याच्या हालचालींवर बंधनं असतील तरच तो आपल्या मतदानाचा अधिकार इतर व्यक्तीला देऊ शकतो.

काँग्रेसने यावेळी असा आक्षेप घेतला आहे की, ते अशिक्षित नाहीत, अंध नाहीत आणि त्यांच्या हलचालींवर देखील मर्यादा नव्हत्या. कारण त्यांनी स्वत: सही केली आहे. त्यामुळे जर ते सही करु शकतात. तर मतपत्रिकेवर 1,2,3,4 असे अंक टाकण्यास काही हरकत नव्हती.

त्यामुळे नियमात कुठेही बसत नसताना दुसऱ्या कोणाला तरी मतदानाचा अधिकार दिला. त्यामुळे हे मत अवैध ठरवावं असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे.

याबाबत आमदारांनी जरी परवानगी घेतली असेल तरी जे काही नियमातील मुद्दे आहेत ते बसत नसतील तर तुम्हाला इतरांना मतांचा अधिकार देता येत नाही. अशा स्वरुपाची तक्रार काँग्रेसने केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT