Prithviraj Chavan: “काँग्रेसमधली सध्याची स्थिती चिंताजनक, राहुल गांधी चार वर्षांपासून भेटले नाहीत”

मुंबई तक

(Rahul Gandhi) सध्याची स्थिती चिंताजनक आहे असं वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. काँग्रेस नेतृत्वात बदल करण्याची मागणी आणि गांधी कुटुंबाला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या G23 गटातील सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी ही टीका केली आहे. एवढंच नाही तर राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्याबाबतही भाष्य केलं आहे. मागच्या चार वर्षांपासून राहुल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

(Rahul Gandhi) सध्याची स्थिती चिंताजनक आहे असं वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. काँग्रेस नेतृत्वात बदल करण्याची मागणी आणि गांधी कुटुंबाला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या G23 गटातील सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी ही टीका केली आहे. एवढंच नाही तर राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्याबाबतही भाष्य केलं आहे. मागच्या चार वर्षांपासून राहुल गांधी भेटलेले नाहीत असंही त्यांनी म्हणत खंत व्यक्त केली आहे.

काय म्हणाले आहेत पृथ्वीराज चव्हाण?

मी जेव्हा दिल्लीत असतो तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतो. त्यांची प्रकृती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. ते रूग्णालयात आहेत, मात्र वेळ मागितली तर ते बोलायला तयार असतात. सोनिया गांधी यांच्याकडेही वेळ मागितल्यावर त्यादेखील भेटतात मात्र राहुल गांधी यांना मागच्या चार वर्षांपासून भेटता आलेलं नाही, असं म्हणत पृथ्वीबाबांनी खंत बोलून दाखवली.

हे वाचलं का?

    follow whatsapp