उद्धव ठाकरे आणि चिराग पासवान होण्यापासून कसे वाचले नितीश कुमार?, बिहारच्या राजकारणाची इनसाइड स्टोरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बिहारच्या राजकारणातही (Bihar Politics) महाराष्ट्रासारखी राजकीय स्क्रिप्ट लिहिली जात होती. महाराष्ट्रात शिवसेनेच्याच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करत उद्धव ठाकरेंना बॅकफुटवरती टाकले. बिहारमध्ये आरसीपी सिंह यांच्याद्वारे ‘शिंदे मॉडेल’ची स्क्रिप्ट लिहिली जात होती, पण जेडीयूचे राजकीय भवितव्य शिवसेनेसारखे होऊ नये, अशी तयारी नितीश कुमार यांनी अत्यंत काटेकोरपणे केली होती.

नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी एकीकडे भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाचा विश्वास कायम ठेवला आणि दुसरीकडे आरजेडीसोबत सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरु केले. नितीश यांनी आधी बंडखोर आरएसपी सिंग यांचे राजकीय स्थान संपवायला सुरुवात केली, नंतर भाजपला त्यांच्याच भाषेत पराभूत करण्याची योजना आखली. नितीश कुमार हे चिराग पासवान आणि उद्धव ठाकरे होण्यापासून कसे थोडक्यात बचावले? याती इनसाईड स्टोरी आपण पाहूयात.

नितीश कुमार यांनी भाजपला कसा शिकवला धडा?

लालू प्रसाद यादव यांच्या कथित ‘जंगलराज’च्या भीतीने विकासाचे नेते म्हणून उदयास आलेले नितीश कुमार तळागाळातील संघर्ष आणि मंडल राजकारणातून पुढे आले आहेत. नितीश कुमार भाजपसोबत मिळून सरकार चालवत होते, परंतु भाजपच्या प्रत्येक हालचालीवरती त्यांचे लक्ष होते. याचे कारण म्हणजे 2020 सालापासून बिहारमध्ये भाजपच्या नेत्यांच्या मनात एक होते की त्यांच्या जास्त जागा निवडूण येऊनही ते नितीश कुमारांच्या दबावाला बळी पडत सरकार चालवत होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यात आपला मुख्यमंत्री असावा असे भाजपच्या नेत्यांना वाटत होते, परंतु केंद्रातील नेत्यांच्या सांगण्यावरुन ते शांत होते. मात्र, हळूहळू या आवाजाचे रूपांतर मोठ्या नाराजीत झाले. वेळोवेळी जेडीयू-भाजप नेत्यांमधील मतभेद वाढत गेले आणि ते बिहार विधानसभेतही दिसून आले. या बिहारमधील नाराजीच्या वातावरणातच एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि राज्यातील भाजप नेते खडबडून जागे झाले. बिहारमध्येही महाराष्ट्रासारखे घडवून आणण्याचा भाजपचा डाव होता परंतु नितीश कुमारांनी तो उधळून लावला.

रामचंद्र प्रसाद सिंग होणार होते बिहारचे एकनाथ शिंदे?

भाजपचे नेते आरसीपी सिंग यांच्यामध्ये ‘एकनाथ शिंदे’ शोधत असल्याचा आरोप जेडीयू नेत्यांनी केला आहे. बिहारमध्ये आरसीपी सिंग यांना सोबत घेऊन भाजप जेडीयूमध्ये फोडाफोडी करण्याच्या तयारीत होते, पण नितीश कुमार यांनी अतिशय काटेकोरपणे संपूर्ण परिस्थितीवर हाताळली. आरसीपी सिंग यांची भाजप नेत्यांशी वाढती जवळीक नितीश यांना जाणवत होती. जेडीयू अध्यक्ष लालन सिंह आरसीपींवरती निशाणा साधताना म्हटले नितीश कुमारांनी तुमच्यावर आंधळा विश्वास ठेवला, पण तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजपचे एजंट बनून जेडीयूमध्ये काम केले.

ADVERTISEMENT

लालन सिंह म्हणाले ”चिराग पासवान यांचा वापर 2020 मध्ये पहिल्यांदा जेडीयूला कमकुवत करण्यासाठी केला गेला होता आणि त्यानंतर आरसीपी सिंग यांच्या माध्यमातून चिराग पार्ट-2 मॉडेल तयार केले जात होते. हा विध्वंस कोठून झाला आणि कसा झाला हे सर्वांना माहिती आहे. नितीश कुमार यांच्या कट वेळीच लक्षात आला, त्यामुळे भाजपचे मनसुबे यशस्वी होऊ शकले नाहीत”.

ADVERTISEMENT

रामचंद्र प्रसाद सिंग यांना अशा प्रकारे केले कमकुवत

बिहारमधील जेडीयूचे राजकीय भवितव्य महाराष्ट्रात शिवसेनेसारखे होऊ नये यासाठी नितीश कुमार यांनी आधीच सर्व तयारी केली होती. जेडीयूने आरसीपी सिंह यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवले नाही, त्यामुळे त्यांना केंद्रातले मंत्रिपदही सोडावे लागले होते. यानंतर, रामचंद्र प्रसाद सिंग यांना कमकुवत करत त्यांच्याकडून सर्व महत्त्वाची पदं हिसकावून घेतली आणि त्यांच्या जवळच्या नेत्यांना पूर्णपणे फोडले.

विशेष म्हणजे आरसीपी सिंह यांची JDU मधून हकालपट्टी करण्याचा कोणताही थेट आदेश जारी करण्यात आलेला नसून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नोटीस बजावण्यात आली आहे. अशा प्रकारे, आरसीपी सिंग यांची प्रतिमा पूर्णपणे डागाळण्याची आणि आमदारांशी संपर्क तोडण्याची रणनीती अवलंबली. नितीश कुमारांचा हा डाव पूर्णपणे यशस्वी झाला.

नितीश कुमार यांनी वेळीच परिस्थिती समजून घेतली आणि त्यानुसार नवी रणनीती आखून भाजपला दबावाखाली आणण्यातही ते यशस्वी झाले. नितीश कुमार हे देखील समजून घेत होते की रामचंद्र प्रसाद सिंग हे जनतेतून निवडूण आलेले नेते नाहीत जे त्यांना आव्हान देऊ शकतात. या वर्षी जूनमध्ये JD(U) ने RCP सिंह यांच्या जवळच्या चार नेत्यांना पक्षविरोधी कारवायांसाठी प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले.

जेडीयूचे सरचिटणीस अनिल कुमार, विपिन कुमार यादव, अजय आलोक आणि पक्षाच्या सामाजिक सुधारणा युनिटचे अध्यक्ष जितेंद्र नीरज यांसारख्या बड्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. परिणामी, JDU मधील एकही जनाधार असलेला नेता RCP यांच्या सोबत उभा राहिला नाही. दुसरीकडे, लालनसिंग यांनी आपली छावणी मजबूत ठेवली होती आणि स्वतः आरजेडीसोबत सरकार स्थापन करण्याची कसरत आधीच सुरू केली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT