Maharashtra: छत्रपती संभाजीनगरातील हिंसा राजकीय की धार्मिक? काय आहे थेअरी?

ADVERTISEMENT

Many possibilities are being expressed regarding the violence in Chhatrapati Sambhajinagar.
Many possibilities are being expressed regarding the violence in Chhatrapati Sambhajinagar.
social share
google news

छत्रपती संभाजीनगर : राम नवमी उत्सवाची तयारी सुरू असतानाच झालेल्या हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. पोलीस प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शहारातील चौका-चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिंदु-मुस्लीम समुदायांमध्ये शांतता समितीच्या बैठका सुरु आहेत. (Chhatrapati Sambhajinagar Violence Incident political or religious?)

अशात आता झालेल्या या हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगरमधील घटनेबाबत अनेक शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. सोबतच पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. हा हिंसाचार राजकीय होता की धार्मिक आणि दोन समुदायांमधील होता? असा सवाल विचारण्यात येत आहे.

हेही वाचा : नाशिक : काळाराम मंदिरात संयोगिता राजेंसोबत घडला धक्कादायक प्रकार

काय आहेत शक्यता?

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत सध्या दोन शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. पहिली शक्यता अशी की, राम मंदिराबाहेर काही समाज विघातक घटकांमध्ये एका छोट्या कारणावरुन भांडण झालं, पण वादातून सुरू झालेल्या भांडणाचं रुपांतर हिंसाचारात झालं, काही हिंसक घटकांनी या प्रकरणाला धर्माशी जोडलं आणि नंतर दंगलखोरांच्या जमावाने हल्ला केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसरी शक्यता अशी की, औरंगाबादच्या नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली 15 दिवसांपासून आंदोलन सुरू होते. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी हिंदू संघटनांनी संभाजीनगर नावाच्या बाजूने रॅली काढली होती, त्यादरम्यान औरंगाबाद नावाचा फलक काढून टाकण्यात आला होता, त्यामुळे हिंसाचारामागे हेही कारण असू शकते.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर हिंसाचार : ओहरमध्ये दोन गटात तुफान दगडफेक, 7 लोक जखमी

हिंसाचार म्हणजे मोठं षडयंत्र?

स्थानिकांच्या आरोपांनुसार, राम नवमीदिवशी शहाराचं वातावरण खराब करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आलं. राधेश्याम शर्मा म्हणाले, इथे आजपर्यंतच वातावरण अत्यंत शांत होतं. पण आता जे झालं ते अत्यंत निंदनीय होतं. दोन्ही समुदायांना भडकविण्यासाठी होतं. पण त्यांचाही रमजानचा महिना आहे, त्यांचा नमाज शांततेत व्हायला पाहिजे, राम मंदिरातील भजन, किर्तन शांततेत पार पडायला पाहिजे. जे काही झालं ते खूपचं निंदनीय होतं.

ADVERTISEMENT

स्थानिकांच्या आरोपांनुसार हिंसाचारामागे काही तरी मोठं षडयंत्र होतं. यामुळे दोन्ही समुदायांमधील बंधूभावात फूट पडली आहे. काल गाड्या वगैरे जाळ्यात आल्या. कमीत कमी १३ गाड्या जाळण्यात आल्या. बाकी दुकानांना कुठेही धक्का लागलेला नाही. षडयंत्र काही तरी मोठं होतं. पण ते अयशस्वी झालं.

ADVERTISEMENT

हेही वाचा : सोमय्यांच्या हाती 20 जणांची साक्ष; ‘जवाब दो’ म्हणत परबांना पुन्हा डिवचलं

पोलील प्रशासनावरही प्रश्नचिन्ह

दरम्यान, या हिंसाचारानंतर पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पोलीसांच्या बेजबाबदारपणामुळे हा हिंसाचार झाला का? हिंसाचाराच्या ठिकाणी पोलीस उशीरा पोहोचले का? वातावरण खराब होतं तर सुरक्षेसाठी काही उपाय का केले नाहीत? जर हिंसाचाराच्या ठिकाणी वेळेत पोहचले तर पोलिसांनी दंगेखोरांची धडपकड का केली नाही?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT