मिसिंग लिंकवर वाहतूक नियम मोडला तर.., फडणवीसांचा इशारा, पण 'त्या' लोकांची मागितली माफी
Devendra Fadnavis on missing link : मिसिंग लिंक प्रकल्पाच्या लोकार्पणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिलाय. ते काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मिसिंग लिंकवर वाहतूक नियम मोडला तर..
फडणवीसांचा इशारा, पण 'त्या' लोकांची मागितली माफी
Devendra Fadnavis on missing link : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आले. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर मुंबई–पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मिसिंग लिंक प्रकल्पाला आलेला खर्च, त्यासाठी कोणी कोणी यासाठी मेहनत घेतली आणि या मिसिंग लिंकवर वाहतूक कोंडी झाल्यास कोणती कारवाई होणार? या संदर्भात प्रकल्पाचे लोकार्पण करताना देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केलंय. ते काय म्हणाले जाणून घेऊयात..
फडणवीसांनी कोणाची मागितली माफी, कोणाला दिला इशारा?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लोकांची मला माफी मागायची आहे. त्यांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला. सुप्रिया सुळे देखील ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. मी सुप्रियाताईंना सांगतो, तुम्ही लास्ट टाईममध्ये या ट्रॅफिकमध्ये अडकला आहात. आता मिसिंग लिंकचा पर्याय उपलब्ध आहे. मी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात अनेकांनी काम केलं. त्यांचंही अभिनंदन करतो. ज्या मजूरांनी या प्रकल्पासाठी काम केलं, त्यांना मनापासून अभिनंदन करतो. सर्वांना शुभेच्छा देतो..सात देशांच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी आणि इन्सिट्युशन्सनी सहभाग घेतला. हवा खेळती राहण्यासाठी बोगद्यामध्ये व्हेंटीलेशनची सोय करण्यात आली आहे. जो मिसिंग लिंकचे वाहतूक नियम पाळणार नाही, त्याला घरात मोठं चलान मिळेल. हे त्याला भरावं लागेल.
हेही वाचा : Govt Jobs : ITI उत्तीर्णांसाठी आनंदाची बातमी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कामाची संधी, 'असा' करा अर्ज
मिसिंग लिंकसाठी पैसा कसा मॅनेज केला?
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या सरकारमध्ये आणि महायुतीच्या सरकारमध्ये काय फरक आहे? हे मला आपल्याला सांगायचं आहे. मिसिंग लिंकची संकल्पना 2010 साली तयार झाली. त्यानंतर त्याचे काही अन्वेषण झाले. त्याचा एक रिपोर्ट तयार झाला. 2014 साली तत्कालीन सरकारने हा प्रकल्प का होऊ शकत नाही? याची अनेक कारणं दिली. फाईल बंद केली. लोणावळा तलावाच्या खालून हा प्रकल्प जातोय, त्यामुळे मिसिंग लिंक करता येत नाही, असं कारण देखील त्यांनी दिलं होतं. 13 कारणं देऊन हा प्रोजेक्ट मुख्यमंत्र्यांनी बंद केला. डिसेंबर 2015 ला जुन्या सरकारचा निर्णय आम्ही बदलला आणि मिसिंग लिंक करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी 5-7 हजार कोटी रुपये लागणार, हे आणायचे कुठून? हा देखील प्रश्न होता. त्यावेळी मी सांगितलं की, हा सेल्फ फायनान्स केला पाहिजे. याची सर्व इक्विटी आपल्याला मुंबई-पुणे दरम्यानच्या टोलमधून मिळू शकते. त्याच पद्धतीने आपण याचं काम केलं. हे इंजिनिअरिंग चॅलेंज होतं. याच डिझाईन करायला तीन वर्ष लागले.









