निधीचं सत्य मांडलेल्या 'मुंबई Tak' चं नाव घेतलं; ओमराजे निंबाळकर तात्काळ कॅमेऱ्यासमोर आले अन्...

मुंबई तक

फुटीर खासदारांना विकास निधी मिळाला नव्हता का? मुंबई Tak ने या सगळ्यांची पडताळणी केली. साहिल जोशी यांच्या Inside Story मध्ये मागील दोन वर्षांतील खासदार निधी आणि त्यातून झालेल्या कामांची सत्यता तपासण्यात आली आहे. या प्रकरणावर ओमराजे निंबाळकरांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.

ADVERTISEMENT

how much funding did omraje nimbalkar receive he held a press conference after watching mumbai tak inside story see clarification he provided
ओमराजे निंबाळकर
google news

धाराशिव: शिवसेना UBT पक्षाच्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत असा दावा केला होता की, केवळ निधी आणि विकासकामांसाठी आपण हा पक्ष प्रवेश केला आहे. ज्यानंतर मुंबई Tak ने अधिकृत आकडेवारीच्या आधारे सहाही खासदारांनी त्यांना मिळणाऱ्या निधीपैकी किती खर्च केला याचं फॅक्ट चेक केलं होतं. ज्याची राजकीय वर्तुळासह सगळीकडेच जोरदार चर्चा झाली. ज्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या खासदार निधीबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर तात्काळ सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.  

मुंबई Tak चे  संपादक साहिल जोशी यांच्या Inside Story मध्ये प्रसिद्ध झालेल्या खासदार निधीच्या आकडेवारीचा उल्लेख करत निंबाळकरांनी खासदारांचा निधी खर्च, कामांची स्थिती आणि खासदार निधीच्या मूल्यमापनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

पाहा ओमराजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले...

ओमराजे निंबाळकर म्हणाले की, त्यांच्या राजकीय निर्णयामागे अनेक कारणं होती. त्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे मतदारसंघातील विकासकामांबाबत मतदारांकडून सातत्याने विचारणा होत होती. "सात वर्ष माझे मतदार मला विचारत आहेत की तुम्ही काय काम करताय? माझ्याकडे तर एक रस्ता मंजूर करण्याचेही अधिकार नाहीत. निधी मिळत नाही. खालपासून वरपर्यंत सगळी सत्ता दुसऱ्यांची असताना विरोधी पक्षाचा खासदार म्हणून मी कसं काम करणार?" असा सवाल त्यांनी केला.

हे ही वाचा>> Inside Story : निधीची बोंबाबोंब करणाऱ्या 'त्या' 6 खासदारांनी तुमची किती कामे केली?

त्यांनी सांगितलं की, त्यांच्या मतदारसंघासाठी 18.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्या निधीपैकी 1.97 कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्याचं दाखवलं जात आहे. तसेच 130 कामं प्रस्तावित करण्यात आली होती, त्यापैकी 21 कामं पूर्ण झाल्याचंही आकडेवारीत दिसत आहे.

हे वाचलं का?