"नरड्याला सुरी लावली तरी ठाकरेंना सोडायचं नव्हतं, एकवचन कशाला बोलतात?"

मुंबई तक

Omraje Nimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे अनेक नागरिकांनी मत व्यक्त केले.

ADVERTISEMENT

Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar
google news

बातम्या हायलाइट

point

"नरड्याला सुरी लावली तरी ठाकरेंना सोडायला पाहिजे नव्हतं, एकवचन कशाला बोलतात?"

point

ओमराजेंनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर धाराशिवकर काय म्हणाले?

Omraje Nimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या निर्णयानंतर धाराशिवमधील सर्वसामान्य नागरिकांची भूमिका जाणून घेण्यासाठी घेतलेल्या प्रतिक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक नागरिकांनी ओमराजे निंबाळकर यांना निवडून देताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वासोबतच ठाकरे कुटुंबावरील विश्वासालाही महत्त्व दिल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी पक्षांतर करण्याऐवजी ठाकरे यांच्यासोबत राहायला हवे होते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. काहींनी हा निर्णय निष्ठेपेक्षा सत्ता आणि पैशांच्या राजकारणाशी जोडून पाहिला, तर काहींनी मतदारांच्या विश्वासाला धक्का बसल्याचे मत मांडले.

हेही वाचा : शिवसेनेविरोधात जिंकलेल्या गोकुळ गीतेंची श्रीकांत शिंदेंच्या शेजारी बसूनच मोठी घोषणा, शिंदेंच्या खेळीने कोण चेकमेट?

"नरड्याला सुरी लावली तरी ठाकरेंना सोडायला पाहिजे नव्हतं"

धाराशिव बसस्थानक परिसरात बोलताना अनेक नागरिकांनी ओमराजे निंबाळकर यांचे काम केल्याचे मान्य केले, मात्र पक्ष बदलण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्टपणे सांगितले. काही नागरिकांनी उद्धव ठाकरे यांनी त्यांना राजकीय संधी दिली आणि मोठे केले, त्यामुळे त्यांनी साथ सोडू नये होती असे मत व्यक्त केले. “आम्ही मतदान करताना फक्त उमेदवाराकडे नाही तर ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे पाहून मतदान केले होते. नरड्याला सुरी लावली तरी सोडायला पाहिजे नव्हतं, एकवचन कशाला बोलतात?" ,” अशी भावना अनेकांनी मांडली. काही नागरिकांनी राजकारणात सातत्याने होत असलेल्या पक्षांतरांमुळे लोकांचा विश्वास उडत असल्याचे सांगितले. “आज एका पक्षात आणि उद्या दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवायचा तरी कसा?” असा सवालही काहींनी उपस्थित केला.

हेही वाचा : दाढी खाजवून आदित्य ठाकरेंनी खिजवलेलं, 24 तासाच्या आतच एकनाथ शिंदेंनी फिरवला गेम! वाचा Inside Story

हे वाचलं का?