नारायण राणेंचा शरद पवारांना धमकीवजा इशारा; ‘आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास…’
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. पवारांनी पुन्हा एकदा आपली पॉवर दाखवून दिली आहे. बंडखोरांमुळे महाविकास आघाडीला कसलाच धोका नाही असे वक्तव्य शरद पवारांनी केले आहे. अडीच वर्षे महाविकास आघाडीने उत्तम कारभार केला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोनाचं संकट असताना जे काही काम केलं आहे ते पाहता महाविकास आघाडी […]
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. पवारांनी पुन्हा एकदा आपली पॉवर दाखवून दिली आहे. बंडखोरांमुळे महाविकास आघाडीला कसलाच धोका नाही असे वक्तव्य शरद पवारांनी केले आहे. अडीच वर्षे महाविकास आघाडीने उत्तम कारभार केला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोनाचं संकट असताना जे काही काम केलं आहे ते पाहता महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग फसला हे म्हणणं गैर आहे.
आत्ता जे महाराष्ट्रात घडलं आहे त्यात आमदारांना राज्याबाहेर घेऊन जाण्यात आलं आहे. ते आमदार जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा चित्र स्पष्ट होईल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात यावच लागेल असे शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्याला केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उत्तर दिले आहे.
“बंडखोर आमदार महाराष्ट्रात येतील तेव्हा…” वाचा काय म्हणाले शरद पवार
नारायण राणे आपले ट्वीटमध्ये काय म्हणाले?