‘…पण यांनी भारत मातेचे तीन तुकडे केले’, राहुल गांधींवर PM मोदींचा घणाघात

भागवत हिरेकर

मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उत्तर दिले. यावेळी इतिहासातील दाखले देत मोदींनी राहुल गांधींवर पलटवार केला.

ADVERTISEMENT

PM Modi Speech on no confidence motion : after opposition raised manipur violence issue in lok sabha, modi slams Rahul gandhi, congress.
PM Modi Speech on no confidence motion : after opposition raised manipur violence issue in lok sabha, modi slams Rahul gandhi, congress.
social share
google news

Narendra Modi speech in lok sabha : ‘मोदीजींनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली. माझ्या दुसऱ्या आईची मणिपूरमध्ये हत्या करण्यात आलीये’, असे म्हणत काग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं. राहुल गांधींच्या या टीकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं. इतिहासाचे दाखले देत मोदींनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर घणाघात केला.

नरेंद्र मोदी काय बोलले? भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

“विरोधकांना राजकारणाशिवाय दुसरं काहीही करायचं नाहीये. मणिपूर प्रकरणावर न्यायालयाचा एक निर्णय आला आहे. मणिपूरमध्ये हिंसा झाली. खूप कुटुंबांना त्रास झाला. अनेकांनी जवळची माणसं गमावली. महिलांसोबत गंभीर गुन्हे झाले. हे गुन्हे अक्षम्य आहेत. दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी केंद्र, राज्य प्रयत्न करत आहेत. देशातील नागरिकांना विश्वास देतो की, लवकरच मणिपूरमध्ये शांतीचा सूर्य उगवेल. मणिपूर आत्मविश्वासाने पुढे जाईल.”

“मणिपूरमधील नागरिकांना सांगू इच्छितो की, देश तुमच्यासोबत आहे. हे सभागृह तुमच्यासोबत आहे. आपण मिळून या आव्हानावर तोडगा काढू. तिथे शांतता नांदेल. मणिपूर पुन्हा विकासाच्या वाटेने जाईल, यासाठी प्रयत्नात कुठलाही कसूर केला जाणार नाही.”

“सभागृहात भारत मातेविषयी जे बोललं गेलं. त्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. मला माहिती नाहीये, सत्तेशिवाय असे हाल होतात. सत्तेशिवाय जगू शकत नाही का? काय भाषा आहे? काही लोक भारत मातेच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करताहेत. यापेक्षा दुर्दैवी काय आहे. हे ते लोक आहेत, जे लोकशाहीच्या हत्येबद्दल बोलतात. कधी संविधानाच्या हत्येबद्दल बोलतात. पण, जे यांच्या मनात आहे. तेच त्यांच्या तोंडून येतं.”

वाचा >> PM Modi: ‘अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ’, पंतप्रधान मोदी लोकसभेत असं का म्हणाले?

“14 ऑगस्ट फाळणीचा दिवस. हा दिवस आजही आपल्याला वेदना देतो. हे ते लोक आहेत, ज्यांनी भारत मातेचे तीन तुकडे केले. जेव्हा भारतामातेला गुलामगिरीतून मुक्त करायचं होतं, तेव्हा या लोकांनी भारतमातेचे हात कापले. तीन तुकडे केले. हे लोक कोणत्या तोंडाने बोलतायची हिंमत करतात.”

हे वाचलं का?

    follow whatsapp