नितीश कुमारांच्या राजकारणाचा असा आहे पॅटर्न! २२ वर्षांचा राजकीय इतिहास काय सांगतो?

मुंबई तक

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपशी युती तोडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लवकरच नितीश कुमार याबाबतची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि जेडीयूची सध्या बिहार राज्यावर सत्ता आहे. नितीश कुमार भाजपशी युती तोडत आरजेडी, काँग्रेस आणि डावे पक्षांसोबत मिळून सरकार बनवणार असल्याची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपशी युती तोडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लवकरच नितीश कुमार याबाबतची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि जेडीयूची सध्या बिहार राज्यावर सत्ता आहे. नितीश कुमार भाजपशी युती तोडत आरजेडी, काँग्रेस आणि डावे पक्षांसोबत मिळून सरकार बनवणार असल्याची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप पाहण्यास मिळणार ही चर्चा आहे.

काय आहे सध्याचं बिहारचं पक्षीय बलाबल?

२०२० साली झालेल्या निवडणुकीत भाजप आणि नितीश कुमारांची जेडीयू एकत्र लढले होते. तर काँग्रेस आणि आरजेडी यांची आघाडी होती. एकूण २४३ जागा असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक ७९ जागा आरजेडीने जिंकल्या होत्या. भाजपला ७७, जेडीयूला ४५, काँग्रेसला १९ तर डावे पक्षांना १६ जागा जिंकता आल्या होत्या. नितीश कुमारांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्या असताना देखील भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले होते. मात्र, मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि जेडीयूमध्ये ऑल इज नॉट वेल नाही हेच दिसून येत आहे. त्यामुळे नितीश कुमार आरजेडी, काँग्रेस, आणि डाव्या पक्षांसोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्यामुळे जर हे पक्ष एकत्र आले तर त्यांना बहुमताच्या आकड्यापर्यंत सहज पोहचता येईल.

लोकसभा निवडणुकीच्याआदी सत्तेतून बाहेर पडण्याचा नितीश कुमारांचा इतिहास

नितीश कुमारांनी अनेकदा भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. तर अनेकदा लोकसभा निवडणुकीच्या अगोदर नितीश कुमार असे पाऊल उचलतात, असेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहिल्यास लक्षात येतं. २०१४ च्या निवडणुकीच्या आगोदर भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फक्त दोनच जागा जिंकता आल्या. या पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

त्यानंतर पुन्हा नितीश कुमार यांनी २०१७ साली भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली होती. त्यादरम्यान देखील २०१९ च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या होत्या. त्यावेळी आरजेडी आणि काँग्रेससोबत महाआघाडी तोडत त्यांनी भाजपशी युती केली होती. तर आता पुन्हा ते भाजपसोबतची युती तोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यावेळी देखील २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp