NCP: दादा की ताई…? ‘चावडी’वर गोंधळलेल्या प्रफुल पटेलांचा दोन आठवड्यातच मोठा प्रताप!
भविष्यात अजितदादा की सुप्रियाताई यापैकी कोणाची निवड करणारा या प्रश्नाला मुंबई Tak चावडीवर देताना प्रफुल पटेल काहीसे गोंधळले होते. मात्र, त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांना आपला पाठिंबा जाहीर केला.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics News Live: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) आज घडीला मोठी फूट पडली आहे. कारण पक्षाचे दिग्गज नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. खरं तर अजित पवार हे भाजपच्या (BJP) सोबत जाणार याबाबत कुणकुण होती. मात्र, त्यांच्यासोबत पक्षाचे कार्याध्यक्ष असलेले प्रफुल पटेल (Praful Patel) हे देखील भाजपसोबत गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कार्याध्यक्ष झाल्यानंतर प्रफुल पटेल हे मुंबई Tak च्या ‘चावडी’वर (Mumbai Tak Chavadi) आले होते. यावेळी त्यांना भविष्यात दादा की ताई? असा सवाल विचारण्यात आला होता. ज्यावर उत्तर देताना प्रफुल पटेल हे काहीसे गोंधळलेले दिसून आले होते. मात्र, चावडीवर येऊन दोन आठवडे होत नाही तोच प्रफुल पटेलांनी पवारांसह संपूर्ण पक्षाला हादरा देणारा असा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं. (praful patel ajitdada or supriyatai mumbai tak chavadi within two weeks left sharad pawar announced support to ajit pawar political news maharashtra)
दादा की ताई..?, पाहा प्रफुल पटेल चावडीवर नेमकं काय म्हणालेले
प्रश्न: भविष्यात असा सवाल येऊ शकतो की, दादा की ताई? अशावेळी प्रफुल पटेल हे कोणाला निवडणार?
प्रफुल पटेल: असं आहे की.. मी माझ्या पक्षात जबाबदार व्यक्ती आहे असं समजूनच काम करतो. मी सुरुवातीला काय म्हटलं की, हा पक्ष माझा आहे.. कोणी जबाबदारी दिली तरच मी माझी जबाबदारी पार पाडायची का? असं थोडी असतं… मला जोपर्यंत असं वाटतं की, माझ्या पक्षामध्ये माझी गरज आहे.. मला काम करण्याची संधी आहे.. तर मग मी माझ्या पक्षासाठी का काम करणार नाही?
हे ही वाचा>> “अजित पवारांचं बंड शरद पवारांना कळलं होतं एक दिवस आधीच”, बंडाची Inside Story
कोणी मला सांगितलं तरच मी काम करेन का? दुसरी गोष्ट तुम्ही हे म्हटलं की, हे की ते.. आता त्या जर-तरच्या प्रश्नांना जर-तर मध्ये उत्तर देणं काही योग्य नाही.. मी माझ्या पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी आहे. सुप्रिया सुळे असो.. अजित पवार असू किंवा इतर कोणी आमचे जयंत पाटील पासून छगन भुजबळ.. किंवा इतर जे कोणी आमचे महत्त्वाचे नेते किंवा प्रमुख मंडळी आहेत त्यांना सगळ्यांच्या सोबत एकत्र काम एकमेकांनी करावं ही महत्त्वाची बाब आहे. आता पुढच्या नंतर काय होईल.. कोणाबरोबर कोण पसंती देईल.. कोणाची पसंती राहील.. हे माझ्या मते महत्त्वाचं नाही.