PI Pratap Darade यांच्या बदलीचे तीव्र पडसाद : आदेशाविरोधात लोकं रस्त्यावर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

(Police inspector Pratap Darades transfer)

अहमदनगर : राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या बदली आदेशाविरोधात तीव्र पडसाद उमटले. राहुरीमधील नागरिकांनी दराडे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरुन चक्काजाम आंदोलन केलं. नागरिकांच्या या आंदोलनात माजीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, रिपाइं (आठवले गट) पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

नेमकं काय आहे प्रकरण?

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील धर्मांतर प्रकरणाचा योग्य पद्धतीनं तपास न केल्याचा ठपका पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला. यावर प्रभारी गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी तत्काळ दराडे यांची येत्या पंधरा दिवसांत चौकशी करण्याचे आणि तोपर्यंत त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश दिले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सरकारच्या या आदेशांविरोधात राहुरीतील नागरिक रस्त्यावर उतरले. नागरिकांनी नगर-मनमाड रस्त्यावर ‘चक्काजाम’ आंदोनल केलं. नागरिकांच्या या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे या आंदोलनात रस्त्यावर उतरले होते. ही बदली सुडबुद्धीनं केली असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

यावेळी बोलताना आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, आम्हाला विधानसभेत बोलू दिलं जातं नसल्यानं रस्त्यावर उतरुन आवाज उठवावा लागत आहे. धर्मांतर प्रकरणात त्यावेळी संबंधित पोलीस निरीक्षकांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले होते. तसंच त्यांचा दहा महिन्यांचा कार्यकाळही कार्यक्षम अधिकारी म्हणून होता.

ADVERTISEMENT

अशा अधिकाऱ्यावर काही तरी चुकीचे आरोप करायचे आणि तकडाफडकी बदली करायची हे योग्य नाही. धर्मांतर होत असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देणार नाही, मात्र चौकशी करण्याआधी अधिकाऱ्याची बदली करणं आम्हाला मान्य नसल्याचही यावेळी तनपुरे यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

राहुरीतील एखाद्या लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला असता तर प्रताप दराडे यांचं काम चुकीच आहे असं आपण मान्य केलं असतं. पण त्यांनी गुन्हेगारीवर चांगला आळा बसवला. शहरातील रोडरोमियोंचा बंदोबस्त करुन गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण केला. त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची बदली होऊ नये यासाठी रास्ता रोको केला असल्याची प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT