राज्यसभा निवडणूक: ‘वर्षा’वरच्या बैठकीतील Inside स्टोरी, मुख्यमंत्र्यांनी आखली रणनिती!

ऋत्विक भालेकर

मुंबई: राज्यसभेसाठी महाराष्ट्रात निवडणूक होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतील अर्ज मागे घेण्यासाठी आज (3 जून) अखेरचा दिवस होता. मात्र, कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज मागे न घेतल्याने आता महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक होणार एवढं निश्चित. निवडणूक होऊ नये यासाठी महाविकास आघाडीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. पण या बैठकीतून काहीही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्यसभेसाठी महाराष्ट्रात निवडणूक होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतील अर्ज मागे घेण्यासाठी आज (3 जून) अखेरचा दिवस होता. मात्र, कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज मागे न घेतल्याने आता महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक होणार एवढं निश्चित. निवडणूक होऊ नये यासाठी महाविकास आघाडीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. पण या बैठकीतून काहीही निष्पन्न झालं नाही. त्यानंतर महाविकास आघाडीने देखील या निवडणुकीसाठी कंबर कसली. निवडणूक होणार हे निश्चित होताच महाविकास आघाडीची एका अत्यंत महत्त्वाची बैठक ‘वर्षा’वर पार पडली. याच बैठकीतील Inside Story आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

राज्यसभा निवडणूक: महाविकास आघाडीच्या बैठकीत काय घडलं?

राज्यसभा निवडणुकीतून भाजपने आपला तिसरा उमेदवार मागे न घेतल्याने महाविकास आघाडीने निवडणुकीसाठी रणनिती ठरविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी ‘वर्षा’वर बैठक पार पडली. जाणून घ्या बैठकीत नेमकं काय घडलं.

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या या बैठकीत राज्यसभेसाठी लागणारं संख्याबळ आणि आकड्यांवर प्राथमिक चर्चा झाली. तिन्ही पक्षातील प्रतिनिधींची एक तज्ज्ञ कमिटी बनविण्यात येईल. ही कमिटी पक्षांतील आमदारांना मतदान कसे करायचे याबाबत सविस्तर माहिती दिली. याच बैठकीत घटक पक्षांबाबत देखील सविस्तर चर्चा झाली.

हे वाचलं का?

    follow whatsapp