RSS आणि मोहन भागवत यांच्या सोशल मीडिया DP वर तिरंगा, विरोधकांनी केली होती टीका

मुंबई तक

देशभरात सध्या स्वातंत्र्याचं ७५ वर्ष म्हणजेच अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने हर घर तिरंगा ही मोहीमही राबवली जाते आहे. मोदी सरकारने केलेल्या आवाहनानंतर लोकांनी सोशल मीडियावर त्यांचा डीपीही तिरंगा ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या हजारो लोकांनी तिरंगा डीपी ठेवला आहे. मात्र RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देशभरात सध्या स्वातंत्र्याचं ७५ वर्ष म्हणजेच अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने हर घर तिरंगा ही मोहीमही राबवली जाते आहे. मोदी सरकारने केलेल्या आवाहनानंतर लोकांनी सोशल मीडियावर त्यांचा डीपीही तिरंगा ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या हजारो लोकांनी तिरंगा डीपी ठेवला आहे. मात्र RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी हा डीपी बदलला नव्हता. त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती. मात्र १३ तारखेला हा डीपी बदलण्यात आला आहे.

मोहन भागवत आणि RSS यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी तिरंगा

मोहन भागवत आणि RSS यांनी त्यांचा डीपी आता तिरंगा ठेवला आहे. RSS च्या ट्विटर पेजचा डीपीही तिरंगा ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करूनही संघाने आणि मोहन भागवत यांनी डीपी बदलला नाही अशी टीका काँग्रेसने केली होती. संघाला तिरंगा पसंत नाही त्यामुळेच ते असं करत आहेत अशीही टीका काँग्रेसने केली होती.

राहुल गांधी यांनीही केलं होतं संघाविषयीचं ट्विट

राहुल गांधी यांनी संघाबाबत ट्विट करत म्हटलं होतं की जे आत्ता हर घर तिरंगा ही मोहीम चालवत आहेत ते अशा संस्थेचा भाग आहेत ज्यांनी ५२ वर्षे तिरंगा फडकवला नव्हता. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस उतरली होती त्यावेळीही आम्हाला रोखू शकले नव्हते आताही रोखू शकणार नाहीत या आशयाचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp