संजय राठोडांना मंत्रिमंडळात घेणं भाजपची ‘केविलवाणी’ अवस्था दाखवणारं?

मुंबई तक

२०२१ मध्ये पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपने आकाश-पाताळ एक केलं होतं. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही अधिवेशन होऊ देणार नाही अशी भूमिकाही त्यावेळी म्हणजेच २०२१ मध्ये विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. तसंच चित्रा वाघही संजय राठोड यांच्या विरोधात आक्रमक झाल्या होत्या. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

२०२१ मध्ये पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपने आकाश-पाताळ एक केलं होतं. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही अधिवेशन होऊ देणार नाही अशी भूमिकाही त्यावेळी म्हणजेच २०२१ मध्ये विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. तसंच चित्रा वाघही संजय राठोड यांच्या विरोधात आक्रमक झाल्या होत्या. अशात आता शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

Pooja Chavan : पूजा चव्हाण, संजय राठोड प्रकरण दुसरीकडेच वळवण्याचा प्रयत्न होतो आहे?

ज्या संजय राठोडांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी भाजपने आकांडतांडव केला होता त्या संजय राठोड यांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात घेणं ही भाजपची केविलवाणी अवस्था दाखवणारं आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. संजय राठोड यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे त्यांनी याबाबत भूमिका मांडली आहे असं कोरडं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

१ मार्च २०२१ ला देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

पत्रकार परिषदेत जी केविलवाणी स्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत मंत्र्यांची मी पाहिली अशी केविलवाणी स्थिती मुख्यमंत्र्यांची येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. जेव्हा धडधडीत खोटं बोलावं लागतं, सगळे पुरावे असताना काही घडलंच नाही असं जेव्हा सांगावं लागतं त्यावेळी काही नैतिक धैर्य साथ देत नाही. चेहऱ्यावर मास्क असतानाही ते दिसत होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर दिलं पाहिजे की ज्या क्लिप्स समोर आल्या आहेत त्या खऱ्या की खोट्या? जे काही यवतमाळमध्ये घडलं ते खरं की खोटं? जे माध्यमांनी बाहेर काढलं ते खरं की खोटं? एवढं झाल्यावर कुणालाही साधूसंत ठरवायचं तर त्यांनी ठरवावं पण तुमची नैतिकता यामुळे समोर येते. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते

हे वाचलं का?

    follow whatsapp