CM शिंदेंविरुद्ध थोपटले दंड! आदित्य ठाकरे कोणत्या मतदारसंघातून देऊ शकतात आव्हान, हे आहेत पर्याय
शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातून निवडणूक लढविणार आणि जिंकणार, असं म्हणतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे.
ADVERTISEMENT

शिवसेना (UBT) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान दिलं आहे. थेट ठाण्यातून निवडणूक लढविणार आणि जिंकणार असा निर्धार ठाकरे यांनी बोलून दाखविला आहे. काल (बुधवारी) ठाण्यात रोशनी शिंदे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध म्हणून पार पडलेल्या जनप्रक्षोभ मोर्चामध्ये त्यांनी ही घोषणा केली. यापूर्वीही त्यांनी ठाण्यातून निवडणूक लढविण्याबाबत भाष्य केलं आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे खरंच ठाण्यातून निवडणूक लढविणार का हा प्रश्न विचारला जात आहे. (Shiv Sena (UBT) leader Aditya Thackeray has challenged Chief Minister Eknath Shinde saying that he will contest and win the election from Thane.)
आदित्य ठाकरे कोणत्या मतदारसंघातून मैदानात उतरणार?
आदित्य ठाकरे ठाण्यातून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत? पण नेमकं काय आहे ठाण्यातील चित्र? ठाणे शहरात सध्या ठाणे शहर, ओवळा-माजीवडा आणि कोपरी-पाचपाखडी असे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी 2 शिवसेना तर 1 भाजपकडे आहे. मात्र या तिन्ही मतदारसंघांवर शिवसेनेचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात दिसून येते.
ठाणे शहर :
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघावर मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता होती. 1990 पासून 2004 पर्यंत इथून मोरेश्वर जोशी आमदार होते. तर 2004 ला एकनाथ शिंदे पहिल्यांदा इथूनच आमदार झाले. 2009 ला मतदारसंघाची पुनरर्चना झाल्यानंतर शिंदे यांनी कोपरी-पाचपाखडीची निवड केली तर इथून राजन विचारे आमदार झाले. पुढे 2014 मध्ये राजन विचारे खासदार झाले. पुढे 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपाच्या मुद्द्यांवरुन शिवसेना-भाजपची युती तुटली. दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले.
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री! आयुक्तांनी सादर केला अहवाल
त्यावेळी या मतदारसंघातून शिवसेनेने रवींद्र फाटक यांना तिकीट दिले. तर भाजपने संजय केळकर यांना मैदानात उतरवलं. संजय केळकर यांनी ताकद लावून रवींद्र फाटक यांना पराभूत करुन हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आणला. 2014 साली संजय केळकर यांनी रवींद्र फाटक यांचा 12 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. तेव्हा केळकर यांना 70 हजार मत मिळाली तर फाटक यांना 58 हजार मत मिळाली.