Aaditya Thackeray: फुटलेले बंडखोर नाही तर गद्दार, महाराष्ट्राबद्दल मनात चांगलं असतं तर…
-एजाज खान, मुंबई युवा सेना अध्यक्ष आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रेच्या निमित्ताने शिवसैनिकांच्या भेटी घेत आहे. शिवसेनेच्या शाखांना भेट देऊन सभा घेत आहेत. पक्षात उभी फूट पडल्यानंतर पक्ष नेतृत्व खडबडून जागे झाले आहे. २१ ते २३ जुलैदरम्यान शिवसेनेची शिव संवाद यात्रा निघणार आहे. आज सभेमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार टीका […]
ADVERTISEMENT

-एजाज खान, मुंबई
युवा सेना अध्यक्ष आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रेच्या निमित्ताने शिवसैनिकांच्या भेटी घेत आहे. शिवसेनेच्या शाखांना भेट देऊन सभा घेत आहेत. पक्षात उभी फूट पडल्यानंतर पक्ष नेतृत्व खडबडून जागे झाले आहे. २१ ते २३ जुलैदरम्यान शिवसेनेची शिव संवाद यात्रा निघणार आहे. आज सभेमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार टीका केली.
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले ”उद्या बरोबर एक महिना होईल, 20 जूनला जी गद्दारी झाली त्याला एक महिना पुर्ण होईल. ही जी गद्दारी झाली आहे ती महाराष्ट्रासोबत झाली आहे.” पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की रोज बातम्यांमध्ये नाट्य सुरू आहे. हे नाट्य आपण खाली पाडणारच, हे स्वतःच्या राजकीय स्वार्थ्यासाठी चाललं आहे. हे सर्व स्वतः सोबत किती आमदार येतात, खासदार येतात हे दिल्लीला दाखवायला सुरू आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
हे बंडखोर नाही, तर गद्दार; आदित्य ठाकरेंचा निशाणा
हे सर्व लोक बंडखोर नाही, हे गद्दार आहेत, जर महाराष्ट्राबद्दल यांच्या मनात चांगलं असतं तर ते आधी सुरत मग गुवाहाटी मग गोव्याला गेले नसते असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. कुर्ल्याला एक इमारत कोसळली तर मी तिथे 2 वाजता होतो, पण तिकडचा आमदार गुवाहाटीमध्ये माजा मारत होता असेही ठाकरे म्हणाले.