Shiv Sena: ‘शिंदेंचे 22 आमदार, 9 खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात’, पुन्हा भूकंप होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

22 shinde mla 9 mps in touch with uddhav thackeray again will there be a political earthquake vinayak raut made a big claim
22 shinde mla 9 mps in touch with uddhav thackeray again will there be a political earthquake vinayak raut made a big claim
social share
google news

Maharashtra Political News: दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: ‘जवळपास 22 आमदार आणि नऊ खासदार माननीय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वांच्या संपर्कात आहेत.’ असा गौप्यस्फोट शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विनायक राऊतांचा हा दावा खरा ठरला तर राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येऊ शकतो. त्यामुळेचा आता त्यांच्या या दाव्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. (22 shinde mla 9 mps in touch with thackeray again will there be a political earthquake vinayak raut made a big claim)

एकनाथ शिंदे गटातील आमदार-खासदार हे आमच्या संपर्कात आहेत. असं विनायक राऊत म्हणाले आहेत. मंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रतिआव्हान दिलं होतं याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत यांनी हा खुलासा केला आहे.

कोल्हापुरात ते माध्यमांशी बोलत होते. ठाकरे गटाच्या कोल्हापुरातील कार्यकर्त्यांच्या एका खाजगी कार्यक्रमाकनिमित्त खासदार विनायक राऊत, दिवाकर रावते हे आले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विनायक राऊतांचा शिंदे गटाच्या आमदारांबाबत खळबळजनक दावा

‘मंत्री शंभूराजे देसाई यांना काय करायचे ते करू द्या, एक मात्र नक्की की, शिंदे गटामध्ये गेलेले बऱ्याच आमदारांमध्ये असंतोष खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या असंतोषाला पहिली वाचा ही गजाभाऊ कीर्तिकर यांनी फोडली आहे. असे अनेक आमदार आहेत की ज्यांचा भ्रमनिरास झाला आहे. 50 खोके आणि कोट्यावधी रुपयांची निधी देण्याचे कबूल करण्यात आले. पण आता तसं काही घडताना दिसत नाही.’

हे ही वाचा >> Balu Dhanorkar : …अन् त्या व्हायरल कॉलने काँग्रेसला महाराष्ट्रात दिला एकमेव खासदार

‘काही जणांना टोकन दिलंच नाही.. तर कोट्यावधी रुपयांची काम मात्र चार-पाच मंत्री सोडले तर बाकीच्यांना सर्वांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत. त्यामुळे सर्वांनाच असं वाटते की, आम्हाला फसवलेलं आहे आणि आपल्याला परतीचा मार्ग स्वीकारावा लागतोय. अशा भावना बऱ्याच जणांमध्ये आहे. म्हणून या मधली सुरुवात गजाभाऊ कीर्तिकर यांनी केली आहे. त्यामुळे आम्ही योग्य वेळेला जाहीर करू.’

ADVERTISEMENT

‘जवळपास 22 आमदार आणि नऊ खासदार माननीय उद्धव ठाकरे यांच्या सर्वांच्या संपर्कात आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये ‘मातोश्री’चे दरवाजे या गद्दारांना उघडे राहणार नाहीत. पण यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल.’ असं म्हणत विनायक राऊत यांनी पुन्हा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊ शकतो असे संकेतच दिले आहेत.

ADVERTISEMENT

‘हे फक्त नोटाबंदी सरकार…’

‘मोदी सरकार नऊ वर्ष पूर्ण करत असताना काँग्रेस पक्षांनी सुद्धा नऊ मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामधला महत्त्वाचा प्रश्न हा नोटबंदीचा आहे. सुरुवातीला 500, हजाराच्या नोटा बंद केला. त्याचा परिणाम काय झाला हा सर्वांना माहित आहे. त्यातून आता पुनश्च दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करायचा आहेत. याचा उद्देश काय आहे? हे फक्त नोटाबंदी सरकार आहे. त्याचा फायदा लोकांना काय होत नाही.’ असं म्हणत विनायक राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हे ही वाचा >> Sakshi Murder : एक्स बॉयफ्रेंड, टॅटू अन् साहिलने गाठली क्रौर्याची परिसीमा

शिंदे गटाचा काय दावा?

दरम्यान, शिंदे गटाकडूनही वारंवार दावा करण्यात येत आहे की, ठाकरेंकडे जे उरलेले आमदार आणि खासदार आहेत. त्यापैकी अनेक जण हे शिंदेंच्या संपर्कात आहेत. येत्या काही दिवसात ते देखील आमदार किंवा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावाही केला जात आहे. अशावेळी आता कोणकोणाला धोबीपछाड देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT