आहिल्यानगर : 3 लाख घेऊन लग्नाची नोटरी, पण कोर्टात विवाह उरकून घरी परतताना नवरी पळून गेली
Ahilyanagar Crime : आहिल्यानगर : 3 लाख घेऊन लग्नाची नोटरी, पण कोर्टात विवाह उरकून घरी परतताना नवरी पळून गेली; दरम्यान, या प्रकरणात नवरदेवाची 3 लाखांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आहिल्यानगर : 3 लाख घेऊन लग्नाची नोटरी केली
पण कोर्टात विवाह उरकून घरी परतताना नवरी पळून गेली
Ahilyanagar Crime : आहिल्यानगर परिसरात सोमवारी (1 डिसेंबर) उघडकीस आलेलं एक प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय ठरलंय. नोटरीद्वारे विवाह करून सासरी निघालेल्या नवरीने अर्ध्या रस्त्यातून अचानक कार बदलून पलायन केल्याची घटना समोर आली आहे. या संपूर्ण प्रकारात 29 वर्षीय शेतकरी अशोक बांदल यांची तब्बल 3 लाखांची फसवणूक झाली आहे.
लग्नासाठी ‘स्थळ’ दाखवण्याचा सौदा
अशोक बांदल हे योग्य वधूच्या शोधात होते. दरम्यान त्यांची ओळख दोन महिन्यांपूर्वी अरविंद राठोड नावाच्या व्यक्तीशी झाली. गावाकडील मुलींची चांगली स्थळे असल्याचे सांगून अरविंदने अशोकचा विश्वास जिंकला. त्याने काही मुलींचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले. त्यापैकी ‘माया शिंदे’ नावाच्या मुलीला अशोकने पसंत केले. मुलीचे वडील निधन झाले असून ती आई आणि भावासोबत राहत असल्याचे तसेच कंपनीत काम करत असल्याची माहिती अरविंदकडून देण्यात आली. लग्नासाठी 3 लाख रुपये ‘स्त्रीधन’ म्हणून द्यावे लागतील, अशी अटही त्याने घातली.
नोटरीवरच विवाह उरकला
30 नोव्हेंबर रोजी ठरल्याप्रमाणे अशोक, त्यांचा चुलतभाऊ आणि नातेवाईक बजाजनगरातील अयोध्यानगरात सविता शिंदे यांच्या घरी मुलगी पाहण्यासाठी गेले. दोघांची पसंती झाल्यानंतर सर्वजण छत्रपती संभाजीनगरातील कोर्टात गेले. वकीलांच्या उपस्थितीत 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर नवरा–नवरी स्वखुषीने विवाह करत असल्याची नोटरी करण्यात आली. कोर्टातून परतल्यावर अशोकने ठरल्याप्रमाणे 1 लाख 45 हजार रुपये फोन पेवर आणि 1 लाख 55 हजार रुपये रोख अशी एकूण 3 लाखांची रक्कम दिली.
हेही वाचा : Mumbai Crime : 14 वर्षीय लेक झोपेत असताना बापानेच ब्लेडने गळा चिरला; पत्नीच्या पोटावरही केले वार










