निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार का घेतली?
Ahilyanagar vidhan parishad election : अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत राणी लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप आणि मतांची गणिते यामागील प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राणी लंके यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार का घेतली?
महाविकास आघाडीकडे किती मतं?
अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत भाजपने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिल्यानंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणांची मोठी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तनपुरे यांना पक्षाने तातडीने उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या विरोधात खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत राणी लंके यांनी अर्ज भरला नाही. याची नेमकी कारणे कोणती आहेत? समजून घेऊयात...
कोणाकडे किती मतं आहेत?
अहिल्यानगर मतदारसंघातील एकूण 452 मतांपैकी भाजपकडे 207, शिवसेनेकडे 44, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 64, तर इतर आणि महाविकास आघाडी मिळून 137 मते असल्याचे चित्र आहे. या आकडेवारीमुळे भाजप आणि महायुतीचे संख्याबळ अधिक असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस नेते करण ससाणे यांनी काँग्रेसच्या तिकिटाऐवजी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा : पत्नी आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या कथित अनैतिक संबंधामुळे पोलीस कर्मचाऱ्याने केले नको ते?









