अजित पवारांच्या भूमिकेला छत्रपती संभाजीराजेंचा विरोध, वादावर म्हणाले..

मुंबई तक

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल करण्यात आलेल्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादाची धूळ खाली बसत नाही, तोच नव्या वादानं डोकं वर काढलंय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या विधानावर आक्षेप घेत भाजप आक्रमक झालीये. याच मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजेंनी अजित पवारांना सुनावलं आहे. राज्यात सुरू झालेल्या नव्या राजकीय वादावर छत्रपती संभाजीराजेंनी पत्रकार परिषद […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल करण्यात आलेल्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादाची धूळ खाली बसत नाही, तोच नव्या वादानं डोकं वर काढलंय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या विधानावर आक्षेप घेत भाजप आक्रमक झालीये. याच मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजेंनी अजित पवारांना सुनावलं आहे.

राज्यात सुरू झालेल्या नव्या राजकीय वादावर छत्रपती संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केलीये. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हिंदवी स्वराज्याचं संरक्षण छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराबाई राणीसाहेब यांनी केलं यात काहीही दुमत नाही.”

“छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आहेत, हे निश्चित आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं सुद्धा रक्षण केलं. हे कुणीही नाकारू शकत नाही. म्हणून संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आहेतच, त्याचबरोबर धर्मरक्षकही असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही”, अशी असं संभाजीराजे म्हणाले.

अजित पवारांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान? भाजप नेत्यांनं केली मोठी मागणी

हे वाचलं का?