Dhananjay Deshmukh: "उद्या गावकऱ्यांच्या मिटिंगमध्ये..." संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय देशमुख काय म्हणाले?
Dhananjay Deshmukh On Krushna Andhale : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर धनंजय देशमुखांचं मोठं विधान!

"सीआयडीने त्यांच्या पद्धतीने ते काम..."

धनंजय देशमुख नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Deshmukh On Krushna Andhale : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला दोन महिने उलटले, तरीही प्रमुख आरोपी कृष्णा आंधळेचा पोलिसांना सुगावा लागला नाहीय. दरम्यान, फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अशातच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंबई तकशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय.
धनंजय देशमुख म्हणाले, "भ्रष्ट मार्गाने संपत्ती असेल, सीआयडीने त्यांच्या पद्धतीने ते काम केलं आहे. तो त्यांचा तपासाचा भाग आहे. त्यांच्या नियमामध्ये ज्या गोष्टी बसतात, त्या केल्या जात आहेत. पण त्यांना लवकरात लवकर अटक करा. बाहेर जिथे आहे तिथून त्याच्या मुसक्या आवळा. त्याला न्यायालयात सादर करा. पोलीस स्टेशनमध्ये आणा. पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशी द्या, अशी आमची मागणी आहे. सीआयडी कार्यालयाने निरोप दिला आणि आम्हाला काही कमी जास्त वाटलं, तर आम्ही स्वत:हून सीआयडी कार्यालयात जातो".
हे ही वाचा >> मुंबईतील बँक घोटाळा, 122 कोटींवर डल्ला.. मॅनेजर हितेश मेहताला अटक
"उद्या गावकऱ्यांची एक मिटिंग आहे. त्या मिटिंगमध्ये ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही उणीव आहेत. त्यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्या आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या पुढं मांडू. तपास योग्य पद्धतीने चालावा. निष्पक्षपातीपणे चालावा. म्हणून आम्ही वेळोवेळी विनंती करत आहेत. वेळोवेळी मागणी करत आहेत. जी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेला एकच मागणी करतोय की, लवकरात लवकर आरोपीला पकडून आम्हाला न्याय द्या", असंही धनंजय देशमुख म्हणाले.
हे ही वाचा >> नवी दिल्ली स्टेशनवर मृत्यूचं तांडव, चेंगराचेंगरीने 18 जणांचा घेतला बळी
सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत धनंजय देशमुख यांनी मोठी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, "त्यांनी कुठल्या प्रकारे भेट घेतली आणि भेट का घेतली, याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशमुख कुटुंबियांना फक्त न्याय पाहिजे. न्याया व्यतिरिक्त कोणतेही गोष्ट देशमुख कुटुंबीय मागत नाही. आरोपींना फाशी झाली पाहिजे. सगळे आरोपी जेरबंद झाले पाहिजेत. कठोरातली कठोर शिक्षा या आरोपींना झाली पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आहे आणी ती कायम असणार आहे. आम्ही आशावादी आहोत. आम्ही पीडित आहोत. आम्ही प्रत्येकाकडून न्यायाची अपेक्षा करत आहोत.