उद्धव ठाकरे हेच भाजपचे नैसर्गिक मित्र, शिंदेंची शिवसेना केवळ ॲडजस्टमेंट? महाराष्ट्रातील 'या' चाली पाहून तुम्हीही हैराण व्हाल!

Maharashtra Politics : महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात तणाव वाढत आहे, तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक वाढत आहे. त्यामुळे बीएमसी निवडणुकीआधी काही मोठ्या आणि अनपेक्षित घडामोडी घडू शकतात.

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात जवळीक वाढली

point

बीएमसी निवडणुकीत भाजप-शिवसेना यूबीटी युती होणार?

point

शिंदेंची सातत्याने सुरू आहे दिल्लीवारी

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः सत्ताधारी युतीमध्ये सर्व काही आलबेल नाही. सध्या कोणीही असा दावा करू शकत नाही. गेल्या काही आठवड्यात राज्यात राजकीय बदलाच्या जोरदार सुरू आहेत. आणि या चर्चा काही विनाकारण नाहीत. जर आपण माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या बारकाईने समजून घेतल्या तर असे म्हणता येईल की राज्यातील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात बरीच धुसफूस आहे. म्हणूनच गेल्या पंधरवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा दिल्ली दौरा केला. मंगळवारी रात्री उशिरा ते पुन्हा एकदा दिल्लीत पोहोचले. बुधवारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेटही त्यांनी घेतली. तर दुसरीकडे, शिवसेना यूबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील दिल्लीत पोहोचले. ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते दिल्लीत आले आहेत.

फडणवीस-ठाकरेंची मैत्री

खरं तर, गेल्या काही आठवड्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली आहे. फडणवीस यांनी उद्धव यांना विधानसभेत खुलेआम महायुतीत येण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर, एका हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांच्या गुप्त बैठकही झाल्याची जोरदार चर्चा आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा होणार राजकीय भूकंप? एकनाथ शिंदे दिल्लीत, रिव्हर्स ऑपरेशन लोट्स अन्...

उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीसांना नुकतेच अनेक प्रसंगीही भेटले आहेत. त्यावेळी ते अत्यंत खेळीमेळीने गप्पा-गोष्टी करताना दिसून आले आहेत. खरं तर राजकारणात कोणतीही बैठक विनाकारण होत नाही. अशा प्रत्येक बैठकीमागे काही ना काही गुपित दडलेलं असतं.

आता आपण राज्याच्या राजकारणाकडे येऊया. सध्या राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारकडे प्रचंड किंवा त्याहून अधिक बहुमत आहे. महायुतीला 2024 च्या विधानसभेत एकतर्फी विजय मिळाला. अशा परिस्थितीत, भाजपने मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवले परंतु त्यांना युतीतील इतर मित्रपक्षांशी, विशेषतः एकनाथ शिंदे यांच्याशी, कठीण सौदेबाजीला सामोरे जावे लागले. 

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडले पण त्या बदल्यात ते सतत बार्गेनिंग करत राहिले. ही बार्गेनिंग आपल्याला अनेक वेळी पाहायला मिळाली. ज्यामुळे भाजपच्या राज्य नेतृत्वाला बराच त्रासही सहन करावा लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Politics: दिल्लीत चाली रचल्या आता महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप? पडद्यामागे चाललंय बरंच काही!

भाजप स्वतः बहुमताच्या जवळ असूनही, देवेंद्र फडणवीस राज्यात आपले एकहाकी वर्चस्व दाखवू शकत नाहीत. ते स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत. असं सातत्याने बोललं जात आहे. याचा पुरावा म्हणजे सरकारला गेल्या 10 महिन्यांत त्यांनीच काढलेले अनेक आदेश मागे घ्यावे लागले आहेत. शिवसेना शिंदे गटाने आणलेला दबाव हे देखील आदेश मागे घेण्यामागे घेण्याचं एक कारण असल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे भाजपचे नैसर्गिक मित्र

सध्या, शिवसेना यूबीटी राज्यात आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना फक्त 20 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी 10 जागा एकट्या मुंबईतून जिंकल्या होत्या. शिवसेनेचा जन्म मुंबईच्या राजकारणातून झाला होता. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्यापैकी 13 जागा भाजपने जिंकल्या आहेत. म्हणजेच शिवसेना यूबीटी हा भाजपनंतर मुंबईत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे. मुंबईत शिंदे गटाला फक्त 6 जागा मिळाल्या होत्या. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे देखील मुंबईतील वरळी मतदारसंघातून आमदार आहेत. यासोबतच, शिवसेना यूबीटीचे बीएमसीमध्ये वर्चस्व राहिले आहे. सध्या शिवसेना राज्य पातळीवर खूपच कमकुवत आहे पण मुंबईत चांगल्या स्थितीत आहे. इतकेच नाही तर विचारसरणी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते अजूनही भाजपच्या जवळ असल्याचे आढळते. तसेच कितीही मतभेद असले तरी उद्धव ठाकरे हे भाजपचे नैसर्गिक मित्र राहिले आहेत.

मुंबई महापालिका निवडणुका

भाजपप्रणित महायुतीतील संघर्षाचा ताजा मुद्दा म्हणजे बीएमसी निवडणुका. BMC ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. तिचे बजेट देशातील अनेक राज्यांपेक्षा मोठे आहे. अशा परिस्थितीत, बीएमसीवरील वर्चस्वासाठीचा संघर्ष खूपच कटू झाला आहे. 2024 च्या लोकसभा आणि त्याच वर्षाच्या अखेरीस झालेल्या विधानसभा या गेल्या दोन निवडणुकांचे आकडे पाहता आजही मुंबईत शिवसेना उद्धव गटाचा प्रभाव बराच आहे. पण परिस्थिती अशी आहे की ताकद असूनही, ते स्वतःहून फार काही करण्याच्या स्थितीत नाही. 

दुसरीकडे, मुंबईत भाजपचा प्रभाव आहे, परंतु ते स्वतःहून खूप प्रभावी ठरतील की नाही हे सांगणे कठीण आहे. अशा परिस्थितीत, जर शिवसेना यूबीटी आणि भाजप एकत्र आले तर या युतीचा पराभव करणे जवळजवळ अशक्य होईल. यामध्ये भाजपसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते शिवसेना यूबीटीशी सहजपणे वाटाघाटी करू शकतील. कारण उद्धव ठाकरे आता त्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढत आहेत. परंतु, शिंदे गटाशी सामना करणे हे एक कठीण काम आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp