'CBSE पॅटर्न आणून SSC बोर्ड बंद करण्याचा सरकारचा डाव', सुप्रिया सुळेंचं 'ते' पत्र अन्...

मुंबई तक

सरकार राज्यातील शाळांमध्ये CBSE बोर्ड लागू करणार असल्याच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना एक पत्रच दिलं आहे.

ADVERTISEMENT

SSC बोर्ड बंद करण्याचा सरकारचा डाव, सुप्रिया सुळेंची टीका (फोटो सौजन्य: फेसबुक)
SSC बोर्ड बंद करण्याचा सरकारचा डाव, सुप्रिया सुळेंची टीका (फोटो सौजन्य: फेसबुक)
social share
google news

SSC vs CBSE: मुंबई: राज्य सरकारने महाराष्ट्रातील राज्य मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) बोर्डाचा अभ्यासक्रम लागू करण्याची घोषणा केली आहे. आता याच निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना एक खरमरीत पत्रच पाठवलं आहे. या निर्णयामुळे या निर्णयामुळे महाराष्ट्राची ओळख तर पुसली जाणार नाही ना अशी शंकाही व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळेंची सरकारवर जोरदार टीका

विधानसभेच्या अधिवेशनात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्यातील सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून  CBSE अभ्यासक्रम लागू करण्याबाबतची माहिती लेखी स्वरूपात दिली आहे. दरम्यान, या निर्णयानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे आपला आक्षेप नोंदवला आहे.

हे ही वाचा>> SSC आणि CBSE बोर्डमध्ये नेमका फरक आहे तरी काय? मुलांनी कोणत्या बोर्डाचं घ्यावं शिक्षण?

सुप्रिया सुळेंनी आपल्या पत्रात म्हटलं की, "महाराष्ट्राला अतिशय समृद्ध आणि उज्ज्वल शिक्षण परंपरा आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या स्वतःच्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करून इतर बोर्डाचं अनुकरण करणं हे खेदजनक आहे. या निर्णयामुळे राज्याचा SSC बोर्ड पूर्णपणे बंद होण्याचा धोका आहे का, असा प्रश्न निर्माण होतो."

सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात असा दावा केला आहे की, हा निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांशी कोणताही सल्ला-मसलत करण्यात आलेली नाही. तसेच, CBSE अभ्यासक्रम लागू केल्याने स्थानिक भाषा आणि संस्कृतीवर आधारित शिक्षणाला धक्का बसेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp