karnataka election : मनसेचा पाठिंबा कुणाला? राज ठाकरेंनी मांडली भूमिका

मुंबई तक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी सीमा भागातील मराठी भाषिकांना मराठी उमेदवारांनाच मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

ADVERTISEMENT

mns president Raj thackeray says marathi speaking people from border area should cast their vote to marathi candidate.
mns president Raj thackeray says marathi speaking people from border area should cast their vote to marathi candidate.
social share
google news

कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून, काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट तर जेडीएसमुळे काही ठिकाणी तिरंगी लढती बघायला मिळणार आहे. दरम्यान, सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीनंही उमेदवार मैदानात उतरवले असून, महाराष्ट्रातील नेत्यांना प्रचारासाठी येण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखरेंच्या दिवशीच त्यांची भूमिका स्पष्ट केली.

कर्नाटकात होत असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रातील नेतेही उतरले आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी पक्षाचे नेते प्रचार करताना दिसले. ठाकरे गटाने उमेदवार दिलेले नसून, संजय राऊत हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेले होते.आता राज ठाकरे यांनीही सीमाभागातील मराठी बांधवांना आवाहन केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुणाला दिला पाठिंबा?

राज ठाकरे यांनी सोशल मीडियातून भूमिका मांडली आहे. राज ठाकरे म्हणतात, “कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी.”

हेही वाचा >> अजितदादा नाही तर सुप्रिया सुळेंमुळे शरद पवारांनी राजीनामा घेतला मागे?

“तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp