'जामीन घेऊ नका, गपागपा सगळं सोडून तिकडं ठेप्याला या'
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी 12 तारखेला मुंबईकडे जाण्याची घोषणा करत मराठा समाजाला टप्प्याटप्प्याने मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले. मुंबईतील मित्र, पाहुणे आणि ओळखीच्या व्यक्तींकडे आधीच राहण्याची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'जामीन घेऊ नका, गपागपा सगळं सोडून तिकडं ठेप्याला या'
मनोज जरांगे पाटलांचा मुंबईच्या आंदोलनासाठी गनिमी कावा
Manoj Jarange Patil Press Conference, जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 12 तारखेला मुंबईला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. तोपर्यंत सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मराठ्यांनी मुंबईत जाण्यास सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, सर्वांनी एकाच वेळी मुंबईकडे न जाता 12 तारखेच्या दोन ते चार दिवस आधीपासून टप्प्याटप्प्याने मुंबईकडे जाण्याची सूचना जरांगे यांनी केली. आधी मुंबईत पोहोचणारे लोक नंतर आझाद मैदानावर येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : गाडी शिकवण्याच्या बहाण्याने 17 वर्षीय मुलीचा विनयभंग, लोकांनी आरोपीचा टक्कल करत फिरवलं
मनोज जरांगेंनी आंदोलकांना सांगितला गनीमी कावा
जरांगे यांनी सांगितले की, 5-6 तारखेनंतर हळूहळू मुंबईकडे निघावे आणि प्रवासादरम्यान कोणालाही संशय येऊ नये, याची काळजी घ्यावी. मुंबईकडे जाणाऱ्यांनी झेंडे बांधून जाऊ नयेत, असेही त्यांनी म्हटले. पोलिसांनी अडवून पोलीस ठाण्यात नेले, तरी घाबरू नका, असे आवाहन करत त्यांनी पोलिसांना त्रास न देण्याची सूचनाही केली. आंदोलनासाठी मुंबईत जाणाऱ्या लोकांनी आधीच मित्र, पाहुणे आणि ओळखीच्या व्यक्तींकडे राहण्याची व्यवस्था शोधून ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : गाडी शिकवण्याच्या बहाण्याने 17 वर्षीय मुलीचा विनयभंग, लोकांनी आरोपीचा टक्कल करत फिरवलं
