कोथरुडच्या कुलकर्णी आणि पेठेतले बापट..

मुंबई तक

Medha kulkarni and Vidyanand Bapat interview : पुण्याच्या गणेशोत्सवातील DJ, ढोल-ताशे, ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक कोंडीवर मेधा कुलकर्णी आणि विद्यानंद बापट यांची रोखठोक भूमिका.

ADVERTISEMENT

Medha kulkarni and Vidyanand Bapat interview
Medha kulkarni and Vidyanand Bapat interview
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुण्याच्या गणेशोत्सवावरील रोखठोक चर्चा पाहा फक्त 'मुंबई Tak' वर..

point

DJ आणि कर्णकर्कश आवाजाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत

Medha Kulkarni | Vidyanand Bapat Interview : पुण्याच्या गणेशोत्सवात DJ, ढोल-ताशे आणि कर्णकर्कश आवाजाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गणेशोत्सवातील जल्लोष, परंपरा आणि उत्सवाचा आनंद एका बाजूला, तर नागरिकांना होणारा ध्वनिप्रदूषणाचा त्रास आणि नियमांचे पालन करण्याची मागणी दुसऱ्या बाजूला आहे. याच पार्श्वभूमीवर कोथरूडच्या मेधा कुलकर्णी आणि पेठेतील विद्यानंद बापट यांच्यासोबत पुण्याच्या गणेशोत्सवावर विशेष चर्चा करण्यात आली. दोघांनीही आपल्या भूमिकेतून DJ, आवाजाची मर्यादा, गणेश मंडळांचा उत्साह, नागरिकांच्या तक्रारी, मिरवणुका आणि पुण्याच्या बदलत्या उत्सव संस्कृतीवर रोखठोक मत मांडले. मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की त्या आस्तिक असून सण-उत्सवांना त्यांचा विरोध नाही; मात्र उत्सव साजरा करताना दुसऱ्याला त्रास होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या मते, स्वातंत्र्याचा उपयोग दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची गळचेपी होईल अशा पद्धतीने करता येणार नाही.

हेही वाचा : गर्भवती महिला कॉन्स्टेबलच्या डोक्यात रॉडने केले वार, पोलीस स्टेशनमध्येच रक्तरंजित थरार

'सार्वजनिक रस्त्यांवर ध्वनीप्रदूषण आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये'

मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, पुणे शहरात DJ किंवा ढोल-ताशांचा आवाज प्रमाणाबाहेर गेल्यास नागरिकांचे फोन येतात आणि त्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करून आवाज कमी करण्याबाबत सांगितले जाते. त्यांच्या मते, ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न केवळ DJ पुरता मर्यादित नसून सर्व प्रकारच्या वाद्यांना लागू होतो. पारंपरिक वाद्ये असली तरी त्यांची संख्या, आवाजाची पातळी आणि कालावधी यांचा विचार झाला पाहिजे. त्यांनी सांगितले की काही गणेश मंडळांनी DJ न वापरण्याचा निर्णय घेतला असून सामाजिक प्रबोधन, ऐतिहासिक देखावे, व्याख्याने, कीर्तन, वक्तृत्व स्पर्धा आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचे त्यांनी कौतुक केले. गणेशोत्सवाचा उपयोग समाजप्रबोधनासाठी व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. सार्वजनिक रस्त्यांवर ध्वनीप्रदूषण आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यावरही त्यांनी भर दिला.

हेही वाचा : मनोज जरांगेंनी खासदार बंडू जाधवांना दम भरला, फोनवर काय बोलून गेले? VIDEO