Exclusive: अमोल कोल्हे पवारांकडे परतले, सांगितली राजभवनातील Inside Story

साहिल जोशी

ADVERTISEMENT

NCP MP Amol Kolhe has now returned to Sharad Pawar. After that, in an exclusive interview with Mumbai Tak, Amol Kolhe told the inside story of what actually happened in the Raj Bhavan
NCP MP Amol Kolhe has now returned to Sharad Pawar. After that, in an exclusive interview with Mumbai Tak, Amol Kolhe told the inside story of what actually happened in the Raj Bhavan
social share
google news

Amol Kolhe NCP: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन चोवीस तासही उलटले नाहीत तोच त्यांना पहिला हादरा बसला आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे काल राजभवनात अजित पवारांच्या शपथविधीला हजर होते. एवढंच नव्हे तर ते राजभवनात सुधीर मुनगंटीवार यांना भेटले त्यावेळी त्यांच्या पाया देखील पडले होते. असं असताना अशी जोरदार चर्चा सुरू होती की, अमोल कोल्हे हे अजित पवारांच्या सोबत गेले आहेत. मात्र, अजित पवारांच्या शपथविधीला 24 तासही उलटत नाही तोच कोल्हेंनी आपली बाजू बदलली आहे. ‘आपण शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असल्याचे त्यांनी यावेली सांगितले आहे.’ त्यामुळे कोल्हे यांची बाजू बदलणं हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. (ncp mp amol kolhe returned to sharad pawar camp exclusive interview mumbai tak inside story what happened raj bhavan ajit pawar swearing ceremony)

अमोल कोल्हे यांचे ट्विट

राष्ट्रवादीचे शिरूरचे लोकसभा खासदार अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘जेव्हा मेंदू आणि मनामध्ये द्वंद असतं तेव्हा मनाचे ऐका. कदाचित मेंदू कधी-कधी नैतिकता विसरते… पण हृदय कधीच नैतिकता विसरत नाही.’ हे ट्विट त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना टॅग केले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, यानंतर अमोल कोल्हे यांनी मुंबई Tak सोबत Exclusive बातचीत केली. पाहा त्यावेळी अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले:

‘काल जो शपथविधी सोहळा झाला त्याची कोणालाही पूर्वकल्पना नव्हती. मी अजितदादांना दुसऱ्या एका कामासाठी भेटण्यासाठी गेलो होतो. पण त्यावेळी जी गोष्ट घडली ती खूपच अचानक घडली ज्याचा आम्हाला देखील धक्का बसला. यानंतर आपण जे म्हणतो की, आपल्या आतला आवाज.. जे आपल्या स्वत:ला उत्तर द्यायचं असतं.. अशा पद्धतीने लोकशाही चालत असेल तर लोकशाहीचं काय होईल? ज्या मतदारांनी मतदान केलं आहे.. त्या मतदारासोबत ही गद्दारी होईल.’

‘मी नेहमी शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारत आलो आहे. जेव्हा या भूमिका मी करतो तेव्हा.. हा माझा आतला आवाज आहे की, नैतिकतेला धरून चालणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. ज्यामुळे आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली तेव्हा मी माझी भूमिका स्पष्ट केली. मी उद्या शरद पवार साहेबांना भेटून माझी सविस्तर भूमिका मांडणार आहे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> NCP: प्रफुल पटेलांकडून नियुक्त्या! आव्हाडांनी शरद पवारांचं थेट पत्रच काढलं, म्हणाले…

‘तेथील लोकांमध्ये फार गडबड दिसून आली. कारण सारं काही झटपट घडत होतं. त्यामुळे माझी कोणाशी फार बातचीत होऊ शकली नाही. पण अनेक लोकं अचंबित झाले होते. ज्यांच्यासोबत माझी बातचीत झाली त्यांना देखील माहिती नव्हतं की, शपथविधी सोहळा लगेच होणार आहे. जर पूर्वकल्पना असती तर चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला असता. पण तो वेळ नाही मिळाला.’

‘सुप्रिया सुळे या आमच्या संसदेतील नेत्या आहेत. जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरुन ही गोष्ट समजली की ही काही पक्षाची भूमिका नाहीए. त्यानंतर हे सगळं सुरू झालं. मी जे म्हटलं की, तुमच्या आतला आवाज काय. जे मी ट्विट केलं की, मेंदू की हृदय.. कोणाचं ऐकायचं.’

ADVERTISEMENT

‘मला वाटतं की, मी आतापर्यंत ज्या भूमिका साकारत आलोय त्यानुसार मला माझ्या मनाचं ऐकलं पाहिजे असं वाटलं. ‘मला वाटतं जे काही कायदेशीर पेच आहेत ते आमचे वरिष्ठ नेते त्याविषयी ठरवतील. पण मी नेहमी बोलतोय की, आतला आवाज.. की लोकांचा लोकशाहीवर विश्वास कायम राहिला पाहिजे.’

‘मला लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावावर, शरद पवारांच्या नावावर मतदान केलं आहे.. अशावेळी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान काही बोलतात किंवा भाजपचे नेते काही बोलतात आणि मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करु हे माझ्या अंर्तआत्म्याला पटणार नाही. म्हणून मी माझा निर्णय घेतला.’

हे ही वाचा>> NCP: जयंत पाटील, आव्हाडांबाबत अजित पवारांनी घेतला प्रचंड मोठा निर्णय

‘राजकारणात दोन-तीन गोष्टींची गरज आहे. ज्या लोकांकडे मी मतं मागितली होती ते कोणत्या मुद्द्यांवर मागितले होते. ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या भरोश्याला मी पात्र आहे का.’

‘छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे बाकी राजांपेक्षा छोटं होतं. भले संपत्तीच्या बाबतीत तेवढं मोठं नव्हतं. पण 350 वर्षानंतर आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं.’ असं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.

सर्व नेत्यांचा मला पाठिंबा: अजित पवार

राष्ट्रवादीतील मतभेदानंतर अजित पवार गटाने जवळपास सर्वच आमदार आणि नेत्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. अजित पवार यांनीही काल पत्रकार परिषदेत तेच सांगितले. पण प्रत्यक्षात अनेक आमदार आणि नेत्यांनीही शरद पवारांना पाठिंबा दर्शवला आहे. आणि काहींनी अजून निर्णय घेतलेला नाही. अजित पवार यांना पक्षाच्या दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा मिळाल्यास त्यांना पक्ष आणि चिन्हावर दावा करणे सोपे जाईल. त्यासाठीच आता त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT