Vidhan Sabha Opinion Poll : विधानसभेतही महायुतीला बसणार झटका, 'मविआ'चं काय? खळबळ उडवणारा सर्व्हे

मुंबई तक

Vidhan Sabha Opinion Poll : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या सर्व्हेत नेमकं काय म्हटलं आहे? ते जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

महायुतीच्या नेत्यांची झोप उडवणारा सर्व्हे समोर आला आहे.
opinion poll mahayuti big blow in vidhan sabha what about maha vikas aghadi sakal media opinion poll
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महायुतीच्या नेत्यांची झोप उडवणारा सर्व्हे समोर आला आहे.

point

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता

point

महाविकास आघाडीला दिलासा मिळण्याचा अंदाज

Vidhan Sabha Opinion Poll : विधान परिषद निवडणुकीत 9 पैकी 9 जागा जिंकून आणल्यानंतर महायुतीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत देखील असाच विजय मिळवू असा विश्वास महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे. असे असताना महायुतीच्या नेत्यांची झोप उडवणारा सर्व्हे समोर आला आहे. यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या सर्व्हेत नेमकं काय म्हटलं आहे? ते जाणून घेऊयात.  (opinion poll mahayuti big blow in vidhan sabha what about maha vikas aghadi sakal media opinion poll) 

सकाळ आणि सामने एक ओपिनियल पोल केला आहे. या ओपिनियन पोलनूसार आगामी विधानसभा निवडणुकीत 288 पैकी महायुतीच्या 136 जागा येण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 152 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Vidhan Parishad Election : "ठाकरेंची दोन मते फुटली", भाजप नेत्याने टाकला राजकीय बॉम्ब

विधानसभा निवडणुकीत आपली पसंती कोणाला? असा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला करण्यात आला होता. या पोलमध्ये महाराष्ट्रातील 48.7 लोकांनी महाविकास आघाडीला पसंती दिली आहे. तर महायुतीला महाराष्ट्रातील 33.1 लोकांनी पसंती दिली आहे. 4.9 टक्के लोकांनी यापैकी नाही हा पर्याय निवडला आहे. तर 13.4 टक्के लोकांनी अद्याप मतं ठरलेलं नाही, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील जनतेची भाजपला पसंती

महाराष्ट्रातील जनता विधानसभेत कोणत्या पक्षाला मतदान करालं? असा सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेत भापज पक्षाला महाराष्ट्रातील 28.5 लोकांनी पसंती दिली आहे. भाजपनंतर सर्वांधिक मतंही काँग्रेसला मिळाली आहेत. काँग्रेसला 24 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नंबर लागतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रातील 14 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला 11.7 लोकांनी पसंती दिली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 06 टक्के मतं मिळाली आहे. आणि शेवटच्या स्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4.2 टक्के लोकांची पसंती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp