Ramdas Kadam : 'शिवसेनेचे खासदार न येता फक्त भाजपचेच आले पाहिजे', कदम संतापले

हर्षदा परब

ADVERTISEMENT

रामदास कदम जागावाटपावरून भाजपला काय म्हणाले?
Ramdas kadam slams BJP over lok sabha seats sharing
social share
google news

Ramdas kadam BJP : आमची हक्काची जागा असताना ती तुम्ही नारायण राणेंना कशी देऊ शकता? नारायण राणे ती जागा कशी मागू शकतात? असे सवाल करत शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांवर संताप व्यक्त केला. लोकसभा जागावाटपाच्या आधी भाजपकडून शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या काही मतदारसंघावरच दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेत धुसफूस वाढली असून, कदम यांनी मुंबई तक ला दिलेल्या मुलाखतीत ही खदखद बोलून दाखवली. (How can bjp claims on Shiv sena lok sabha seats, asked ramdas kadam)

भाजपने तीन लोकसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. त्यावरून तुम्ही थेट भाजपवर टीका केली. तुमची नेमकी भूमिका काय आहे? 

या प्रश्नाला उत्तर देताना रामदास कदम म्हणाले, "मी भाजपवर टीका केलेली नाही. मात्र एक गोष्ट निश्चितपणे आहे की, महाराष्ट्रातील जी मंडळी आहे. गोव्यातून जी मंडळी येतायेत, त्यांचं कसं चाललं आहे... विद्ममान खासदार असतानाही त्याला बाजूला ठेवून तिथे भाजपचा उमेदवार कसा देता येईल?"

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

"आता उदाहरण द्यायचंच झालं तर रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे विद्ममान खासदार आहेत. मोदीजी आणि शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपसोबत आलेले आहेत. असं असताना भाजपचे धैर्यशील पाटील... मग हा विश्वासघात होतो ना. विद्ममान खासदाराला बाजूला ठेवून...", असं कदम म्हणाले. 

शाह यांनी स्वतः लक्ष घालायला हवं... -रामदास कदम

"या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत. एक गुहागर मतदारसंघ आहे, तो मी बघतोय. तटकरेंचे आहे. मग सगळे आमदार सोबत असताना तुम्ही असा कसा दावा सांगू शकता की, आम्हाला जागा द्या. माझं मत एवढंच आहे की, यामध्ये स्वतः शाह यांनी लक्ष घालायला हवं."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजप खासदाराचा महिलेसोबतचा कथित व्हिडीओ व्हायरल

"कारण महाराष्ट्रामधून आपलीच पोळी भाजून घेण्यासाठी वरच्या नेत्यांचा, मंडळींचा गैरसमज करून कदाचित हे चाललंय असा माझा अंदाज आहे. कारण शाहजी आणि मोदीजी असा अन्याय करणार नाहीत, असा माझा पूर्ण विश्वास आहे."

ADVERTISEMENT

"भाजपने माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला" 

"पण, महाराष्ट्रात आतापर्यंत तेच झालंय की, शिवसेनेच्या आमदारांना भाजपची मते द्यायची नाही. २०१९ मध्ये दापोलीत निवडणूक झाली. माझा मुलगा मतदारसंघातून उभा होता. भाजपने उघड उघड राष्ट्रवादीला मते टाकली, युती असताना. आणि माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला. असं एकाच ठिकाणी झालं नाही. संबंध महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालं आहे."

"म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराला पाडायचं आणि शिवसेनेची मते घेऊन आपण आपले आमदार निवडून आणायचे आणि जागा वाढवायच्या. हे सातत्याने चाललं आहे, हे थांबलं पाहिजे. यामध्ये मोदी-शाह यांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे. म्हणून मी काल एक शब्द बोलून गेलो की, आपला पक्ष फक्त वाढला पाहिजे. आणि बाकी सगळे पक्ष संपले पाहिजेत, अशी भूमिका आहे की काय काही लोकांची? संशयाला जागा आहे म्हणून मी बोललो", अशी खदखद रामदास कदम यांनी व्यक्त केली.  

"आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विनायक राऊत हे खासदार उबाठाकडे आहेत. पण, ती जागा शिवसेनेची म्हणजे आमची आहे ना. मग तुम्ही तिथे नारायण राणेंना कशी देऊ शकता? किंवा राणे साहेब ती जागा कशी मागू शकतात? मागच्या वेळी विनायक राऊतांचा प्रचार मी स्वतः जाऊन केला. कणकवलीमध्ये. असं असताना... तिथे आमचा हक्क असताना आमचा उमेदवार देण्याऐवजी तुम्ही तिथे वेगवेगळी नावे पुढे आणाल, तर ते कसं आम्ही सहन करून घेणार... मग तोंड दाबून बुक्क्यांचा मार आम्ही सहन करून घ्यायचा का?", असा सवाल कदम यांनी भाजपला केला. 

महाराष्ट्रातील काही मंडळीचं कारस्थान... कदम काय बोलून गेले?

"मला युतीमध्ये कुठेही ठिणगी पाडायची नाही, मी काल नाईलाजाने बोललो. आम्ही भाऊ भाऊ आहे... भावा-भावाप्रमाणेच ते चालले पाहिजे, अशी इच्छा आहे. पण आम्ही मागच्या वेळी जेवढ्या जागा लढवल्या, तेवढ्या जागा तुम्ही आम्हाला दिल्याच पाहिजे ना. आता संभाजीनगरची जागा आमची आहे. मग असं असताना तुम्ही तिथे भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्याला कामाला लावलं आहे. हे सगळं जे चाललंय ते ठिक नाही, असं मला निश्चितपणे वाटतं. म्हणून मी म्हणालो की, आपण दोघे भाऊ भाऊ, तुझं वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू. असं होत नाही ना?", असंही रामदास कदम म्हणाले. 

हेही वाचा >> ठाकरेंच्या जवळच्या नेत्याभोवती चौकशीचा फास, प्रकरण काय?

"आमचा पक्ष वेगळा आहे. तुमचा पक्ष वेगळा आहे. आपण युतीमध्ये आलोय. तुमच्या हातात केंद्र सरकार आहे, पण त्या केंद्र सरकारला सपोर्ट आम्हीच दिलाय ना? आमचे खासदार तुमच्यासोबत दिले आहेत ना? मग भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे खासदार न येता फक्त भाजपचेच आले पाहिजे... जास्त संख्येने आणि आम्हाला तिकिटेच द्यायची नाहीत, असं कटकारस्थान महाराष्ट्रातील काही मंडळींचं असेल. वरिष्ठ पातळीवर दखल घेतली पाहिजे, असं मला वाटतं", अशी शंका रामदास कदम यांनी बोलून दाखवली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT