INDIA Alliance : वाद टाळण्यासाठी फॉर्म्युला ठरला; वाचा मुंबई बैठकीची Inside Story

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

INDIA Alliance Mumbai Baithak Inside Story : INDIA आघाडीच्या 28 विरोधी पक्षांचे नेते दोन दिवसांपासून मुंबईत बैठकीसाठी उपस्थित आहेत. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये हे नेते 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी रणनीती आखण्यात गुंतले आहेत. गुरुवारी (31 ऑगस्ट), बैठकीच्या पहिल्या दिवशी, इंडिया आघाडीने निवडणूक मोडमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत NDA विरुद्ध लढण्याची योजना आखली. बैठकीमध्ये काही नेत्यांनी जागावाटप लवकरच अंतिम करून संयुक्त अजेंडा आणण्याचा आग्रह धरला. चला तर मग जाणून घेऊयात मुंबई बैठकीची Inside Story… (Read Inside Story which important issues were discussed in the INDIA Alliance Mumbai meeting)

Exclusive: इंडिया आघाडीची मुंबईतली बैठक संपली…ग्रँड हयात हॉटेलमध्ये काय घडलं?

बैठकीत कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

  • मुंबई बैठकीच्या पहिल्या दिवशी दोन स्तरांवर समन्वय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली समिती केंद्रात आणि दुसरी राज्यस्तरावर असेल. यापुढील महत्त्वाच्या रणनीतीसाठी दोघेही एकत्र काम करतील.
  • गुरुवारी (31 ऑगस्ट) झालेल्या चर्चेदरम्यान, समन्वय समितीमध्ये किमान चार गट असतील, एक आघाडीच्या संयुक्त कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी, दुसरा कृती आराखडा तयार करण्यासाठी, तिसरा सोशल मीडिया हाताळण्यासाठी, आणि चौथा रिसर्च आणि डेटा विश्लेषणात सहभागी होईल. याशिवाय संयुक्त प्रचार आणि रॅलींची रूपरेषा तयार करण्यासाठी एक उपसमितीही स्थापन करण्यात येणार आहे. शुक्रवारीही (1 सप्टेंबर) आघाडीसाठी समन्वयक करण्याबाबत चर्चा होऊ शकते.
  • बैठकीत सर्व पक्षांकडून समन्वय समितीत कोणाला ठेवायचं आहे, अशा नेत्यांची नावं मागवण्यात आली आहेत.

    भाजप सध्या दहशतीत आहे, त्यामुळे लवकरच समन्वय समिती व इतर गट तयार करण्याची गरज असल्याचे इंडिया आघाडी गटाचे मत आहे. समितीनंतर विरोधी आघाडी जागावाटपाबाबत चर्चा करू शकते, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

  • हे निर्णय लवकर न घेतल्यास भाजप, आघाडीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करेल, अशीही चर्चा इंडिया आघाडीच्या बैठकीत झाली.
  • मुदतपूर्व निवडणुकांच्या परिस्थितींवरही बैठकीत चर्चा झाली. भाजप लवकरच निवडणुका घेऊ शकतो, अशा स्थितीत वेळ वाया घालवू नये, असा विश्वास आघाडीला आहे.
  • राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आणि अजेंड्यात सर्वसामान्यांच्या समस्यांशी निगडित मुद्दे असावेत.
  • इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पुढील रणनीती जलद बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मुद्द्यावर आजच्या (1 सप्टेंबर) बैठकीत चर्चा होणार आहे. गुरुवारीही (31 ऑगस्ट) यावर चर्चा झाली. यादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, एनडीएच्या आश्चर्यकारक रणनीती आणि हालचालींना तोंड देण्यासाठी विरोधकांनी सर्व आकस्मिक योजनांसाठी तयार राहावे.
  • तसंच बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी नेत्यांसाठी डिनर पार्टीचे आयोजन केले होते.
  • MSCB Scam : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण; नवीन चार्जशीटमध्ये 14 नावे, अजित पवारांचे नाव आहे का?

    2 ऑक्टोबरपर्यंत आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करा – ममता बॅनर्जी

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुचवलं की, इंडिया आघाडीने आपला जाहीरनामा 2 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करावा. त्याच वेळी, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सुचवलं की, आघाडीने पुढील महिन्याच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांमध्ये जागावाटप निश्चित करावी.

    हे वाचलं का?

    ADVERTISEMENT

    समाजवादी पक्षाचे (सपा) राम गोपाल यादव यांनीही राज्यांतील पक्षांमधील जागावाटप लवकरच निश्चित करण्याचं आवाहन केलं असून, विरोधी आघाडीकडे वेळच उरलेला नाही. बैठकीत खरगे यांनी समान राष्ट्रीय अजेंडा तयार करण्यास सांगितलं. त्यासाठी बुलेट पॉइंट तयार करण्यास त्यांनी नेत्यांना सांगितलं.

    गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी संसदेचे अधिवेशन बोलावलं जात असल्याचं शिवसेना (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितलं. ते म्हणाले, ‘आपण आपल्या योजनांना अधिक विलंब करू नये आणि लवकरात लवकर काम सुरू केलं पाहिजे.’

    ADVERTISEMENT

    Pariament special session : PM मोदींचं धक्कातंत्र, टाकला नवा डाव अन्…

    EVM चा मुद्दाही उपस्थित!

    या बैठकीत बहुतांश नेते निवडणुकीच्या आराखड्याला लवकरच अंतिम स्वरूप देण्यावर एकमत झाल्याचं दिसून आलं. अशा वेळी आघाडीला वेळच उरला नसून नुसत्या बैठकाही पुरणार ​​नाहीत, अशी शक्यता नेत्यांनी व्यक्त केली. काही नेत्यांनी बैठकीत ईव्हीएमचा मुद्दाही उपस्थित केला.

    ADVERTISEMENT

    आजच्या बैठकीत काय होणार?

    मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी समन्वय समितीत सहभागी होण्यासाठी नेत्यांना प्रत्येकी एका नेत्याचं नाव विचारलं. आज (1 सप्टेंबर) INDIA alliance चा लोगो लाँच होणार आहे. या बैठकीत भारताच्या प्रवक्त्यांच्या एका संघाच्या गरजेवर चर्चा करण्यात आली, जी आघाडीच्या वतीने सादर करेल. याशिवाय बैठकीच्या अजेंड्यावरही चर्चा झाली. या बैठकीनंतर इंडिया आघाडीचे नेते एक संयुक्त निवेदन जारी करतील.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT