रक्ताचं नातं असून साताऱ्याचे दोन्ही राजे सारखे का भिडतात? इतिहासातच आहे उत्तर!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Udayanaraje and Shivendrasinghraje Bhosale’s Dispute : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanaraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinghraje Bhosale) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. खरं तर हे दोघंही एकमेकांचे भाऊ आहेत. एवढंच नव्हे तर गेली अनेक वर्ष एकाच राजकीय पक्षातही आहेत. तरी त्यांच्यात आणि त्यांच्या समर्थकात नेहमीच वैर भावना पाहायला मिळते. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेसिंह भोसले यांच्यात सतत भांडणं होत असतात. बुधवारी 21 जून रोजी साताऱ्यात नूतन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूमिपूजनावेळी ते दोघंही आमनेसामने आले. त्यांच्या समर्थकांमध्ये भूमिपूजनावरून राडा झाल्याने आता पुन्हा एकदा त्यांच्यातील असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. (Satara Udayanaraje and Shivendrasinghraje Bhosale’s are brothers but What is the reason of dispute between them)

उदयनराजे भोसले यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1966 रोजी तर शिवेंद्रराजे भोसले यांचा जन्म 30 मार्च 1973 रोजी साताऱ्याच्या राजघराण्यात झाला. ते दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत. उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आहेत. राजेशाही व्यक्तिमत्त्व असणारे उदयनराजे हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. 1990 मध्ये उच्चशिक्षण घेऊन लंडनमधून परतल्यानंतर त्यांनी राजकीय वर्चस्वासाठी राजकारणात उडी घेतली. आता सध्या ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. तर शिवेंद्रराजे हे भाजपचेच विधानसभेवर निवडून गेलेले आमदार आहेत.

पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीआधीच आप-काँग्रेसचं बिनसलं, काय टाकली अट?

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद वडिलोपार्जित!

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद हा नवीन नाही तर जुनाच आहे. साताऱ्यातील दोन राजेंमधील या वादाचं कारण काय? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उदयनराजे भोसले यांचे वडील प्रतापसिंहराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वडील अभयसिंहराजे भोसले हे सख्खे भाऊ होते. तर, उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे चुलत भाऊ आहेत. त्यावेळी काका अभयसिंहराजे काँग्रेस पक्षात होते. त्यांनी राजकारणात पुढचं पाऊल टाकत अनेक मोठ्या कामांची सुरूवात केली अन् सहकार चळवळीच्या माध्यमातून कारखाना, दोन बँका उभारल्या.

उदयनराजेंच्या आई कल्पानाराजे यांच्या डोळ्यांदेखत हे सारं होत होतं. त्यामुळे त्यांना या गोष्टी खटकू लागल्या होत्या. हळूहळू मुलाच्या भविष्याची त्यांना चिंता भासू लागली अन् त्याच ईर्षेतून त्यांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. 1989 मध्ये कल्पनाराजेंनी शिवसेनेचा हात धरत राजकारणात उडी घेतली. एवढंच नव्हे तर त्या निवडणुकीच्या रणांगणातही उतरल्या. त्यांना शिवसेनेने साताऱ्यातून उमेदवारी देऊ केली. साताऱ्यातून कल्पनाराजे शिवसेनेच्या उमेदवार म्हणून अभयसिंहराजे यांच्याविरोधात उभ्या राहिल्या. पण त्या फार काळ काही टिकू शकल्या नाहीत.

ADVERTISEMENT

‘डिलिव्हरी बॉय’चे काम करून MPSCची तयारी; राहुल हंडोरे इतका क्रूर का झाला?

ज्यावेळी 1991 मध्ये सातारा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली होती तेव्हा, उदयनराजेंनी काकांविरोधात स्वत:चं पॅनेल उभं केलं होतं. यावेळी उदयनराजे एका वॉर्डात विजयी ठरले तर दुसरीकडे त्यांचा पराभव झाला. 1996 मध्ये त्यांनी नव्याने सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष राहून लढवली होती. यावेळी निवडणुकीच्या कुंपणात उदयनराजे उमेदवार म्हणून उभे असताना काकांनीच त्यांचा गेम केला. अभयसिंहराजे यांनी पक्षशिस्त म्हणून काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसले यांचा प्रचार केला. त्यामुळे अभयसिंह राजे आणि उदयनराजे यांच्यात फूट पडली.

ADVERTISEMENT

1998 ला लोकसभेची निवडणूक झाली. यावेळी अभयसिंहराजे साताऱ्याचे आमदार असतानाही लोकसभेला उभे राहिले आणि निवडून आले होते. पण, नंतर ते जेव्हा लोकसभेत गेले तेव्हा उदयनराजेंच्या मनी एक इच्छा उत्कट झाली. विधानसभेची जागा मिळावी अशी त्यांची इच्छा होती पण, सर्वावर पाणी फेरलं गेलं. कारण अभयसिंहराजेंनी मुलाची हमी घेतली अन् विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी शिवेंद्रराजे यांना मिळाली. याचा संताप उदयनराजेंना कुठेतरी होताच अशात भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी उदयनराजेंना भाजपमध्ये येण्यासाठी तयार केलं. पुढे ते भाजपचे उमेदवार झाले.

अभयसिंहराजेंनी मुलाची हमी घेतल्यानंतर एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी देखील आली. याचीच सहानुभूती ही उदयनराजेंना मिळाली आणि पुढे त्यांनी निवडणूक जिंकून दाखवली. यानंतर 1999 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. यावेळी उदयनराजे आणि काका अभयसिंहराजे भोसले आमनेसामने होते. त्यावेळी अशी घटना घडली ज्यामुळे सगळीकडेच खळबळ माजली होती.

मतदानाच्या आदल्या रात्री अभयसिंहराजे यांच्या शरद लेवे नावाच्या नगरसेवकाचा खून झाला. हा खून उदयनराजेंनी केला असा गंभीर आरोप त्यावेळी झाला होता. ज्यामुळे उदयनराजेंना 22 महिने तुरूंगवास देखील भोगावा लागला होता. शिक्षा भोगून उदयनराजेंची निर्दोष मुक्तता झाली. पण याच प्रकरणानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद अधिक वाढला.

दरम्यान, काही वर्षांनी राजकारण बदललं आणि उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले. मात्र, तरीही दोन्ही राजेंमध्ये स्थानिक मुद्यांवर सातत्याने वाद पाहायला मिळाले होते. अनेकदा स्वत: शरद पवारांनी त्यांच्यामध्ये मध्यस्थी देखील केली होती. असं असताना गेली अनेक वर्ष दोन्ही राजे हे निवडणुकीच्या रिंगणात मात्र, आपआपल्या ताकदीवर निवडून येत होते.

Udayanraje Bhosale: दोन्ही राजांमध्ये असं काय घडलं… की, फडणवीसांनी गाठलं थेट सातारा!

2014 च्या मोदी लाटेत देखील उदयनराजेंनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला होता. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत देखील शिवेंद्रराजेंनी विजय मिळवलेला. तेव्हा हो दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होते. मात्र 2019 ला राजकारणाने कूस बदलली. 2019 लोकसभा निवडणुकीला उदयनराजे दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले. पण यावेळी त्यांचं मताधिक्य कमी झालं होतं.

अशावेळी देशात पुन्हा मोदी सरकार आलं होतं. ज्यामुळे उदयनराजे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झालेल्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी झालंही तसंच.. अवघ्या काही महिन्यांपूर्वी निवडून आलेल्या उदयनराजेंनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर शिवेंद्रराजेंनी देखील विधानसभेच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपची वाट धरली होती.

त्यावेळी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक देखील घेण्यात आली. मात्र, याच निवडणुकीत उदयनराजेंना मोठा धक्का बसला.. सलग तीनदा खासदार म्हणून निवडून आलेल्या राजेंना चक्क पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी अशीही चर्चा होती की, या उदयनराजेंच्या पराभवाला शिवेंद्रराजेंचा हातभार होता. ज्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद दिवसेंदिवस अधिकच वाढत गेला. जो अद्यापही कायम आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT