Exclusive : ठाकरे म्हणाले, 'मविआ'तून बाहेर पडेन; 'त्या' बैठकीत काय घडलं?
Uddhav Thackeray News : महाविकास आघाडीत पडद्यामागे खूप मोठी घडामोड घडल्याची सुत्रांकडून माहिती मिळते आहे. थेट ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याचीही चर्चा आहे. नेमकं विधानपरिषद निवडणुकी दरम्यान पडद्यामागे काय घडलंय? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत तीव्र संघर्ष

महाविकास आघाडी सोडण्याची धमकी

उद्धव ठाकरेंचा शरद पवारांच्या कॉल नो रिस्पॉन्स
Uddhav Thackeray : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने त्यांचे 9 पैकी 9 उमेदवार जिंकून आणले तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार जिंकले, तर शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आणि अपक्ष उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटलांच्या या पराभवानंतर आरोप प्रत्यारोप सुरु असले तरी महाविकास आघाडीत पडद्यामागे खूप मोठी घडामोड घडल्याची सुत्रांकडून माहिती मिळते आहे. थेट ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याचीही चर्चा आहे. नेमकं विधानपरिषद निवडणुकी दरम्यान पडद्यामागे काय घडलंय? हे जाणून घेऊयात. (uddhav thackeray big statement get out on maha vikas aghadi sharad pawar call not received meeting inside story read full artical)
विधानपरिषद निवडणुकी पुर्वी झालेल्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह नृपाल पाटील आणि शरद पवार समर्थक उमेदवार जयंत पाटील यांचे पुत्र व पुतणे निनाद पाटील यांनी रात्री उशिरा बैठकीत घुसले.यावेळी निनाद पाटील यांनी ठाकरे सेनेचे नेते अनिल देसाई यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली. ठाकरेंची सेना त्यांचे काका जयंत पाटील यांच्या विरोधात कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत तीव्र संघर्ष निर्माण झाला.
हे ही वाचा : Chhagan Bhujbal : 'शरद पवारांचे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेत', भुजबळांच्या विधानाने खळबळ
इतकचं नाही तर उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा निकाल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गेल्यास महाविकास आघाडी सोडण्याची धमकी दिली, अशी सूत्रांनी माहिती आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एमएलसी निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक फोन केले होते. मात्र उद्धव ठाकरे त्यांच्या फोनला उत्तर दिले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेससोबत आमदारावरून वाद
ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी पहिल्या पसंतीच्या 22 मतांनी विजय मिळवला होता, ज्यात काँग्रेसची 7 आणि ठाकरेंच्या शिवसेनेची 15 आणि एक अपक्ष आमदार होता. खरं तर काँग्रेसची ही 7 मतं मिळवण्यासाठी ठाकरेंना खूप संघर्ष करावा लागला होता. कारण ठाकरेंना पाठिंब्यासाठी काँग्रेसने ज्या आमदारांचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये मोहनराव हंबर्डे, हिरामणी खोसकर, सुलभा खोडके, कुणाल पाटील आणि शिरीष चौधरी या काँग्रेस आमदारांच्या नावांचा समावेश होता. या आमदारांची मतं फुटण्याची ठाकरेंना भीती होती.