Uddhav Thackeray: मविआने रणशिंग फुकलं! ठाकरेंचा मित्रपक्षांनाच क्लिअर 'मेसेज'
Uddhav Thackeray Latest News: महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मविआचा पहिला मेळावा मुंबईत पार पडला. यावेळी ठाकरेंनी मित्रपक्षाना क्लिअर मेसेज दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरे मविआच्या मेळाव्यात काय बोलले?
जागावाटपाबद्दल काय दिला मेसेज?
मुख्यमंत्रिपदाबद्दल ठाकरेंना का बोलावं लागलं?
Uddhav Thackeray News Marathi: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लांबणीवर केल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑक्टोबर ऐवजी नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याचा अंदाज आहे. पण, राज्यात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महाविकास आघाडीनेही शुक्रवारी (१६ ऑगस्ट) प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. मविआच्या पहिल्याच मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना स्पष्ट मेसेज दिला. ठाकरे नेमके काय म्हणाले? ()
महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेले भाषण महायुतीवर टीका करण्यापेक्षा मविआसाठीच्या 'मेसेज'मुळेच जास्त चर्चेचा विषय ठरले. उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवत मित्रपक्षांसमोर स्पष्ट भूमिका केली. ठाकरे काय म्हणाले ते आधी वाचा...
महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ठाकरे 'मविआ'बद्दल काय बोलले?
उद्धव ठाकरे म्हणाले, "अशी जिद्द पाहिजे की, एकतर तू राहशील किंवा मी राहीन. या जिद्दीने लढाई लढली पाहिजे. फक्त तू राहशील किंवा मी राहीन हे आपल्या तिघांत वा आपल्या मित्रपक्षात नको. नाहीतर काँग्रेस राष्ट्रवादीला बोलते, राष्ट्रवादी आम्हाला बोलते, आम्ही आणखी कुणाला बोलतो."
"आपल्यात काड्या घालणारी लोक युतीमध्ये बसली आहेत. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार की आणखी कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की, पृथ्वीराजजी, पवारजी तुम्ही आता तुमच्यापैकी कुणीही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल."










