‘निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा घडवलं?’, सत्यपाल मलिकांच्या खळबळजनक आरोपानंतर राऊतांचा हल्लाबोल

योगेश पांडे

ADVERTISEMENT

pulwama attack satyapal malik sensational accusation sanjay raut
pulwama attack satyapal malik sensational accusation sanjay raut
social share
google news

नागपूर: ‘ज्या दिवशी पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला (Pulwama attack) झाला त्याच दिवशी संध्याकाळी पंतप्रधान मोदींना (PM Modi) फोन केला आणि सांगितलं की पुलवामा हे आपल्या सरकारच्या चुकीमुळे घडलं आहे. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं, तर हे घडलं नसतं. पण त्यावेळी पंतप्रधान मोदींनी मला सांगितलं की, आत्ता तुम्ही शांत राहा.’ असा गंभीर आरोप जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केल्यानंतर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करत गंभीर आरोपही केले आहेत. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (was pulwama staged to win elections sanjay raut attack after satyapal malik sensational accusation)

‘सुरक्षा जवानांची पुलवामामध्ये हत्या करावी आणि नंतर त्याचं राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात अशी काही योजना होती का? भाजपनेच नेमलेले तेव्हाचे राज्यपाल सत्यपाल यांनी तेच सत्य समोर आणलं.. स्फोटक सत्य समोर आणलंय आणि ते पुलवामाच्या स्फोटापेक्षा भयंकर आहे.’ असं म्हणत संजय राऊत यांनी पुलवामा हल्ल्याबाबत मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

पाहा पुलवामा हल्ल्याबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

‘ही गोष्ट देशाला आधीच माहित होती की, पुलवामा हल्ल्यात काही तरी गडबड आणि घोटाळा आहे. यामध्ये तेव्हाचे सत्ताधारी जे 2019 ला सामोरे जात होते. आता जे सत्तेवर आहेत. त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी ते काही तरी गडबड करतील अशाप्रकारची.. भारत-पाकिस्तान, हल्ला वैगरे.. हे प्रश्न आम्ही वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला की, किती किलो आरडीएक्स गेलं.. पुलवामामध्ये आरडीएक्स पोहचलं कसं? इतका कडेकोट बंदोबस्त असताना आरडीएक्स पोहचलं कसं?’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे देखील वाचा- “देशात तेवढेच करायचे बाकी”, उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पुन्हा डिवचलं

‘पुलवामाच्या रस्त्यांवरून सुरक्षाकर्मी कधीही प्रवास करत नाहीत. त्यांना एअरफोर्सने किंवा सरकारने विमान का दिलं नाही? की, त्यांची पुलवामामध्ये हत्या करावी आणि नंतर त्याचं राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात अशी काही योजना होती का?’

‘हे प्रश्न सुद्धा तेव्हा विरोधी पक्षाने विचारले. पण असे प्रश्न विचारणाऱ्यांना राष्ट्रद्रोही, देशद्रोही असं करून गप्प करण्यात आलं. पण आज सत्यपाल मलिक जे तेव्हाचे राज्यपाल होते.. जे त्यांनीच नेमलेले राज्यपाल होते. त्यांनी तेच सत्य.. स्फोटक सत्य समोर आणलंय आणि ते पुलवामाच्या स्फोटापेक्षा भयंकर आहे. या सरकारवर देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे. पण जे जबाबदार आहेत जे मंत्री त्यांचं कोर्ट मार्शल व्हायला पाहिजे.’ असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांनी पंतप्रधान मोदींवर नेमकं काय आरोप केले?

सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत हा खळबळजनक खुलासा केला आहे. सत्यपाल मलिक यांनी मुलाखतीत म्हटले आहे की, सीआरपीएफने ताफा घेऊन जाण्यासाठी गृह मंत्रालयाकडे पाच विमानांची मागणी केली होती. परंतु गृह मंत्रालयाने सीआरपीएफला विमान देण्यास मान्यता दिली नाही.’

ADVERTISEMENT

हे देखील वाचा- ‘अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र, पण…’, ठाकरेंचा ‘सामना’तून सवाल

सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, ‘विमान उपलब्ध झाले असते तर हल्ला झाला नसता. हल्ल्याच्या संध्याकाळीच मी पंतप्रधान मोदींना सांगितले होते की, आमच्यामुळे शहीद जवानांचे प्राण गेले. यावर पंतप्रधानांनी मला शांत राहण्यास सांगितले.’

‘हल्ल्याच्या दिवशी पंतप्रधान जिम कॉर्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते, पंतप्रधान मोदींना या हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी पार्कमधून बाहेर आल्यावर एका ढाब्यावर मला कॉल केला. तेव्हा सांगितले की, मी अत्यंत दुःखी आहे असं म्हणत सत्यपाल मलिक यांनी संपूर्ण हकीकत पंतप्रधानांना सांगितली. मात्र, पंतप्रधानांनी हे पुढे कोणालाही सांगू नये असं म्हटलं.’

सत्यपाल मलिक म्हणाले की, ‘त्यांना हीच गोष्ट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनाही सांगितली. डोभाल यांनीही त्यांना गप्प राहण्यास सांगितले. डोभाल माझा वर्गमित्र आहेत. त्यामुळे तो माझ्याशी काहीही बोलू शकतो. त्याने देखील सांगितलं की, सत्यपाल भाई याबाबत काहीही बोलू नका.’

हे देखील वाचा- उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस ठरवून एकत्र आले? ठाकरेंना टोला लगावत राऊतांनी दिलं उत्तर

सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, ‘त्यांच्या अधिकारात असते तर त्यांनी सीआरपीएफला विमाने उपलब्ध करून दिली असती कारण केवळ पाच विमानांची गरज होती.’

या खुलाशांवर सत्यपाल मलिक यांची मुलाखत घेणाऱ्या करण थापर यांनी पुन्हा विचारले की, ‘त्यांना पंतप्रधान मोदींनी गप्प राहण्याचा सल्ला दिला होता का? याचाच अर्थ पुलवामा हल्ल्याचा निवडणुकीत फायदा उठवण्याचा प्रयत्न झाला.’ यावर सत्यपाल मलिक यांनी सहमती दर्शवत पुढे सांगितले की, याप्रकरणी सर्व दोष पाकिस्तानवर टाकून मोदी सरकार आपल्या जबाबदारीपासून दूर गेले आहे.’ असे अत्यंत गंभीर आरोप सत्यपाल मलिक यांनी केले आहेत.

हे देखील वाचा- ‘…त्यावरून दंगली घडवल्या जातील’; संजय राऊतांचं मोदींवर टीकास्त्र, सावरकरांवरून सवाल

आता सत्यपाल मलिक यांच्या या आरोपानंतर काँग्रेस आणि विरोधकांनी मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पंतप्रधान मोदी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT