BJP vs Shiv sena: '30 वर्ष शिवसेनेत होते काय उ$%#?, तोंड फोडल्याशिवाय...', मंत्री रवींद्र चव्हाणांचा तोल ढळला
Ravindra Chavan vs Ramdas Kadam: शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांच्यावर टीका करताना भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांची जीभ घसरली आहे. जाणून घ्या नेमका वाद काय आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये जुंपली
रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यात वाद
कदमांवर टीका करताना रवींद्र चव्हाणांची जीभ घसरली
BJP Minister Ravindra Chavan: मुंबई: भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचा आपल्याच मित्र पक्षातील नेत्यावर टीका करताना तोल ढळल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळालं आहे. रवींद्र चव्हाण हे युती तोडण्याचं काम करत आहेत. त्यांचा राजीनामा घ्या.. तसंच मुंबई-गोवा हायवे हा रस्ता खड्ड्यात आहे... अशी टीका शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी केली होती. ज्याला प्रत्युत्तर देताना रवींद्र चव्हाण यांची जीभ घसरली. (what was doing it 30 years in shiv sena it wont be without breaking your mouth bjp minister ravindra chavan lost his balance while criticizing ramdas kadam.)
रामदास कदमांवर टीका करताना रवींद्र चव्हाणांची जीभ घसरली...
रामदास कदम यांनी आतापर्यंत अनेकदा रवींद्र चव्हाण यांच्यावर उघडउघड टीका केली आहे. पण काल (18 ऑगस्ट) केलेल्या टिकेला उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांचा पारा भलताच चढला.
हे ही वाचा>> Maratha Reservation: 'मराठ्यांनी उभा देश चालवायचा, आरक्षणाचं कुठून काढलं?', संभाजी भिडेंचा यू-टर्न
'बोलायला ना मला सुद्धा येतं.. कधी तरी रस्त्यात समोरा-समोर या.. कशा भाषेत मला बोलता येतं ना.. कोणी वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा.. रवी चव्हाण आहे.. रवी चव्हाणसारखं उत्तर देऊ शकतो. परंतु युती धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काहीही बोलेल आणि ऐकून घेऊ.. होणार नाही असं एवढं लक्षात ठेवा. तोंड सांभाळून बोलायचं तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही..'
'मला असं वाटतं की, या संदर्भातील जो प्रश्न आहे... तो (रामदास कदम) अडाणी माणूस आहे असं माझं मतं आहे. हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो नितीन गडकरी साहेब यांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे मला असं वाटतं की, तो अडाण्यासारखा प्रश्न आहे. त्याच्या बाजूला बसणारे, टाळ्या वाजवणारे त्याच पद्धतीचे असावेत. 15 वर्ष स्वत: मंत्री होते. 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते.. काय उ$%#?' अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदमांवर टीका केली.










