Shiv Sena : CM शिंदेंनी ठाकरेंना का दिलं नाही निमंत्रण? आमदाराने केला खुलासा

भागवत हिरेकर

Uddhav Thackeray vs eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे उद्धव ठाकरे यांना निमंत्रणच दिले नाही. त्यावरून राजकारण सुरू झाले असून, शहाजीबापू पाटील यांनी यामागील कारण सांगितलं.

ADVERTISEMENT

politics heated in shiv sena two factions after cm eknath shinde did not invited to uddhav thackeray for all party meeting.
politics heated in shiv sena two factions after cm eknath shinde did not invited to uddhav thackeray for all party meeting.
google news

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षण देण्यासंदर्भात चर्चा करून ठराव करण्यात आले. पण, सरकारने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीचे उद्धव ठाकरेंनाच निमंत्रण न दिलं गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यावरून ठाकरेंच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्यही केलं. पण, याच कारण शिंदेंसोबत असणाऱ्या शहाजी बापू पाटील यांनी खुलासा केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील कुणालाही निमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं. यावरून ठाकरे गटाकडून शिंदेंवर टीका करण्यात आली.

शिंदेंनी उद्धव ठाकरेंना का बोलावलं नाही?

शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबद्दल खुलासा केला. उद्धव ठाकरेंना निमंत्रण न देण्यामागचं कारण सांगताना शहाजी बापू पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचा पक्ष निवडणूक आयोगाच्या यादीत अधिकृत नसल्याने त्यांना बोलवलं नाही.”

हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘या’ मराठा व्यक्तीला मिळालं पहिलं कुणबी जात प्रमाणपत्र

“सरकार पडेल याकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे डोळे लागले आहेत. परंतु संजय राऊत यांचे यापूर्वीच विसर्जन झाले आहे”, असा टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला.

हे वाचलं का?