“10 दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र”, सुप्रिया सुळेंचा संताप, सीमावादाच्या झळा दिल्लीपर्यंत
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न पेटला असून, याच्या झळा दिल्लीपर्यंत पोहोचल्या आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनीही सीमाभागात मराठी भाषिकांना करण्यात आलेल्या मारहाणीचा धिक्कार केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र तोडण्याची भाषा भाजप करत असल्याचा आरोप भाजपवर […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न पेटला असून, याच्या झळा दिल्लीपर्यंत पोहोचल्या आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनीही सीमाभागात मराठी भाषिकांना करण्यात आलेल्या मारहाणीचा धिक्कार केला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र तोडण्याची भाषा भाजप करत असल्याचा आरोप भाजपवर केला. तर विनायक राऊतांनी मंत्र्यांच्या प्रवेशावर घालण्यात आलेल्या बंदीचा मुद्दा उपस्थित केला.
‘कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या तोडी महाराष्ट्र तोडण्याची भाषा’ -सुप्रिया सुळे
लोकसभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलत आहेत. काल तर हद्दच केली. कर्नाटकाच्या सीमेवर महाराष्ट्रातील लोक जाऊ इच्छित होते, त्यांना मारहाण करण्यात आली. मागील दहा दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरू आहे.”
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, “कर्नाटकाचे मुख्यमंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत आहेत. दोन्ही राज्यात (महाराष्ट्र आणि कर्नाटक)भाजपचं सरकार आहे. महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे आणि कर्नाटकातही. असं असूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलताहेत. महाराष्ट्रीय माणसांना मारलं गेलं. हे चालणार नाही. हा देश एक आहे. मी अमित शाहांना विनंती करते.”