अजित पवारांविरुद्ध भाजप रस्त्यावर! ठाकरे उतरले मैदानात, चढवला हल्ला
“छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्य रक्षक म्हणतो. ते धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही.” अजित पवारांनी केलेल्या याच विधानावरून राज्यातलं राजकारण तापलंय. अजित पवारांविरोधात भाजप रस्त्यावर उतरल्यानंतर ठाकरेंनी मैदानात उडी घेत भाजपवर हल्ला चढवला. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असं अजित पवारांनी म्हटल्यानं भाजपने त्यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू केलंय. भाजपनं सोमवारी (1 […]
ADVERTISEMENT

“छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्य रक्षक म्हणतो. ते धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही.” अजित पवारांनी केलेल्या याच विधानावरून राज्यातलं राजकारण तापलंय. अजित पवारांविरोधात भाजप रस्त्यावर उतरल्यानंतर ठाकरेंनी मैदानात उडी घेत भाजपवर हल्ला चढवला.
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असं अजित पवारांनी म्हटल्यानं भाजपने त्यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू केलंय. भाजपनं सोमवारी (1 डिसेंबर) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली. भाजप आक्रमक झाल्यानंतर ठाकरेंनी सामना अग्रलेखातून भाजपवर पलटवार केला आहे.
‘…तर आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरतील’, संजय राऊतांचं विधान
अजित पवारांच्या भूमिकेशी शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) असहमत
अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेशी सहमत नसल्याचं ठाकरेंनी सुरूवातीलाच सामना अग्रलेखातून स्पष्ट केलंय. अग्रलेखात म्हटलंय की, “अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून भाजपने धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठीही छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले. अजित पवार म्हणतात, ‘छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते. धर्मवीर नव्हते.’ आम्ही म्हणतो, खरा धर्मवीरच स्वराज्याचा रक्षक असतो. तेव्हा त्यात उगाच श्लेष काढून कोणाला छाती पिटण्याची गरज नाही”, असं म्हणत अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलंय.