Uddhav Thackeray Sabha : उद्धव ठाकरेंच्या सभेवरून भाजपचे शिवसेनेला ‘टोमणे’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे सभा होत आहे. या सभेवरून भाजपनं शहरभर पोस्टरबाजी केली असून, शहरातील विविध प्रश्नांसह औरंगाबादच्या नामांतरावरूनही शिवसेनेला चिमटे काढले आहेत.

शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा औरंगाबादमध्ये स्थापन झाली होती. औरंगाबाद शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (८ जून) सभा होणार आहे.

राज्यसभा निवडणूक : ‘ट्रायडंट’मधील बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना काय म्हणाले?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज ठाकरेंची सभा झालेल्या औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मडळाच्या मैदानावरच ही सभा होत असून, या सभेचे टीझरही शिवसेनेकडून रिलीज करण्यात आले आहेत.

राज्यसभा, विधान परिषद आणि आगामी महापालिका, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत आहे. त्यामुळे ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

भाजपची शहरभर पोस्टरबाजी

औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्न सातत्याने चर्चिला जातो. गेल्या काही महिन्यांपासून हा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. शिवसेनेची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या या मुद्द्यावरूनच भाजप आता शिवसेनेची कोंडी करताना दिसतं आहे.

“महाविकास आघाडी सेक्युलर आहे की हिंदुत्ववादी?”अबू आझमींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करावं, ही शिवसेनेची मागणी अनेक काळापासूनची राहिली आहे. शिवसेनेकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला जातो. मात्र, गेल्या अडीच वर्षांच्या सत्ता काळात शिवसेनेनं औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यापासून अंतर राखलेलं आहे.

शहरात महापालिका निवडणुकीचे वेध लागले असून, आता उद्धव ठाकरे औरंगाबादच्या नामांतराबद्दल काय बोलतात, हे महत्त्वाचं असणार आहे. मात्र, उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी भाजपने औरंगाबाद शहरातील विविध समस्यांवरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

भाजपनं शहरभर होर्डिग्ज लावल्या आहेत. ‘संभाजीनगर नामकरणाच्या आश्वासनाचा वर्धापन दिन?… उत्तर मागतंय संभाजीनगर’, ‘टँकरलॉबीचा वर्धापन दिन… उत्तर मागतंय संभाजीनगर’, ‘पाणीप्रश्नाचा वर्धापन दिन… उत्तर मागतंय संभाजीनगर’, अशी होर्डिंगबाजी करत भाजपने शिवसेनेला टोले लगावले आहेत.

उद्धव ठाकरे काय देणार उत्तर?

औरंगाबादमधील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नावरून काही दिवसांपूर्वी भाजपने मोर्चा काढला होता. त्यानंतर आज होर्डिंगबाजी भाजपकडून करण्यात आलीये. त्यामुळे उद्धव ठाकरे औरंगाबादबद्दल काय बोलणार आणि भाजपला काय उत्तर देणार हे औत्सुक्याचं असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT