सदाभाऊ खोतांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार का घेतली?; फडणवीस म्हणतात…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यात येत्या २० तारखेला विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहे. भाजपप्रणित सहावे उमेदवार असलेल्या सदाभाऊ खोतांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपचे पाच उमेदवार राहिले आहेत. सदाभाऊ खोतांनी उमेदवारी अर्ज मागे का घेतला याबाबत फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले आहे. ”पक्षात सर्वांशी चर्चा करून सदाभाऊंचा अर्ज मागे घेण्यात आला आहे” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

भाजपचे पाचवे उमेदवार असलेले प्रसाद लाड यांना निवडणून आणण्यासाठी भाजपला कसरत करावी लागणार आहे. कारण भाजपला पाचव्या जागेसाठी कोट्यापेक्षा कमी मतं शिल्लक राहत आहेत. याबाबात देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही निवडणूक सोपी बिलकूल नाहीये. आम्ही सर्व गणितं आखलेली आहेत. पाचवा उमेदवार आमचाच निवडून येईल.

कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार रिंगणात?

भाजप

उमा खापरे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रवीण दरेकर

राम शिंदे

ADVERTISEMENT

श्रीकांत भारतीय

ADVERTISEMENT

प्रसाद लाड

भाजपने हे आपले पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. प्रवीण दरेकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. प्रसाद लाड यांच्याविषयी भाजप कशी रणनिती वापरते हे पाहावे लागणार आहे.

शिवसेना

आमश्या पाडवी

सचिन अहिर

राष्ट्रवादी काँग्रेस

रामराजे नाईक निंबाळकर

एकनाथ खडसे

शिवसेनेचे राज्यसभेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक शिवसेनेसाठी अधिक महत्त्वाची आहे. तर रामराजे नाईक निंबाळकरांना राष्ट्रवादीने पुन्हा उमेदवारी दिली आहे.

काँग्रेस

चंद्रकांत हंडोरे

भाई जगताप

काँग्रेसच्या आमदारांचा आकडा जर पाहिला तर भाई जगताप यांनाही धोका आहे. भाई जगताप हे महाविकास आघाडीचे पाचवे उमेदवार आहेत. त्यामुळे खरी लढत ही भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT